शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

गावाकडचे रस्ते झाले मुके, संवादही फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

रस्त्यावर.... चहाचा दरवळ व वड्यांचा सुरसूर आवाज ऐकू येत नाही. नांदगाव : सकाळी रस्त्यावर गर्दी ...

रस्त्यावर.... चहाचा दरवळ व वड्यांचा सुरसूर आवाज ऐकू येत नाही.

नांदगाव

: सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसे कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाल्याने आपापसातला जणू संवादच हरवल्याची स्थिती झाली असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त करण्यात येत आहे.

एरव्ही सकाळी सात वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत की त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या वड्यांचा सुरसूर आवाजही नाही आणि गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही.

“ चल या बातीवर” चहा पाजतो असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे पाजणारे व त्यांच्याकडून चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत. सकाळच्या गप्पाटप्पा व चहा, नाश्ता टपरीवर जाऊनच करायचा असा दंडक असलेल्या मंडळीची संख्या गावाकडे मोठी असते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच रस्ते गर्दीने जिवंत होतात. कोरोना काळातील निर्बंधांमुळे गावाकडचे रस्ते जणू 'मुके' झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.

नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजवताना दिसणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्त्यावर चिटपाखरू नसल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

कालच्या रात्री वीज गेली होती, कोणाच्या घरात भांडण झाले, गल्लीतल्या आयपीएलमध्ये कोण जिंकले व कोण हरले, शेजारच्या मुलीला बघायला कुठले पाहुणे आले होते यापासून तर सरकार कोणाचे येणार व पडणार इथंपर्यंत दररोज रंगणारा गप्पांचा फड हे सगळे सध्या बंद असल्याने समाज मन अस्वस्थ आहे. घरात बसून घुसमटत आहेत. संवादाने कट्टी घेतली आहे. केव्हा हा कोरोना संपतो आणि सगळे सुरळीत होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालेगाव-औरंगाबाद रस्त्यावरचे कासारी असो की, जळगाव बु. मधून जाणारा चाळीसगाव रस्ता यांच्यासह साकोरे, वेहेळगाव, न्यायडोंगरी आदी गावातील वर्दळ चिडीचूप झाली आहे.

कोट......

आमचे निम्मे गाव सकाळी रस्त्यावर जमा झालेले असते. गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. गावातला संवाद येथे अनुभवायला मिळतो. सध्या संवाद थांबला असला तरी गावकरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत. हे दिवसही निघून जातील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

- हेमंत सानप, सरपंच, कासारी