शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडचे रस्ते झाले मुके, संवादही फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

रस्त्यावर.... चहाचा दरवळ व वड्यांचा सुरसूर आवाज ऐकू येत नाही. नांदगाव : सकाळी रस्त्यावर गर्दी ...

रस्त्यावर.... चहाचा दरवळ व वड्यांचा सुरसूर आवाज ऐकू येत नाही.

नांदगाव

: सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसे कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाल्याने आपापसातला जणू संवादच हरवल्याची स्थिती झाली असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त करण्यात येत आहे.

एरव्ही सकाळी सात वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत की त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या वड्यांचा सुरसूर आवाजही नाही आणि गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही.

“ चल या बातीवर” चहा पाजतो असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे पाजणारे व त्यांच्याकडून चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत. सकाळच्या गप्पाटप्पा व चहा, नाश्ता टपरीवर जाऊनच करायचा असा दंडक असलेल्या मंडळीची संख्या गावाकडे मोठी असते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासूनच रस्ते गर्दीने जिवंत होतात. कोरोना काळातील निर्बंधांमुळे गावाकडचे रस्ते जणू 'मुके' झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.

नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजवताना दिसणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्त्यावर चिटपाखरू नसल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

कालच्या रात्री वीज गेली होती, कोणाच्या घरात भांडण झाले, गल्लीतल्या आयपीएलमध्ये कोण जिंकले व कोण हरले, शेजारच्या मुलीला बघायला कुठले पाहुणे आले होते यापासून तर सरकार कोणाचे येणार व पडणार इथंपर्यंत दररोज रंगणारा गप्पांचा फड हे सगळे सध्या बंद असल्याने समाज मन अस्वस्थ आहे. घरात बसून घुसमटत आहेत. संवादाने कट्टी घेतली आहे. केव्हा हा कोरोना संपतो आणि सगळे सुरळीत होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालेगाव-औरंगाबाद रस्त्यावरचे कासारी असो की, जळगाव बु. मधून जाणारा चाळीसगाव रस्ता यांच्यासह साकोरे, वेहेळगाव, न्यायडोंगरी आदी गावातील वर्दळ चिडीचूप झाली आहे.

कोट......

आमचे निम्मे गाव सकाळी रस्त्यावर जमा झालेले असते. गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. गावातला संवाद येथे अनुभवायला मिळतो. सध्या संवाद थांबला असला तरी गावकरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत. हे दिवसही निघून जातील अशी सर्वांना अपेक्षा आहे.

- हेमंत सानप, सरपंच, कासारी