शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

ठेकेदार, अधिकारी यांच्या अभद्र ‘आघाडी’मुळे रस्त्यांची लागली वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST

नितीन बोरसे सटाणा : बागलाण तालुका हा म्हणायला आदिवासी तालुका आहे. मात्र, लागून गुजरात राज्य आणि जिल्हा नाशिक असल्यामुळे ...

नितीन बोरसे

सटाणा : बागलाण तालुका हा म्हणायला आदिवासी तालुका आहे. मात्र, लागून गुजरात राज्य आणि जिल्हा नाशिक असल्यामुळे या शेतीप्रधान तालुक्यातील जनता व्यापारी शेतीकडे आकर्षित झाली आहे. पारंपरिक शेतीला मूठमाती देऊन व्यावसायिक शेतीकडे हा तालुका वळला आहे. त्यामुळे साहजिकच दळणवळणाच्या बाबतीत जनतादेखील जागृत असल्याचे बघायला मिळते. त्यामुळेच मुख्य रस्ता असो वा ग्रामीण रस्ते यांची झालेली दुरवस्था याला अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र आघाडी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत जनतेने संबंधित यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात बसविल्याचे चित्र समोर आहे.

बागलाण हा संवेदनशील तालुका आहे. सोशल मीडियामुळे जग गतिमान झाले आहे. त्यामुळे सटाणा शहराचा बाह्य वळण रस्ता असो वा शिर्डी-साक्री रस्त्याचे चौपदरीकरण याबाबत संधिसाधू मंडळींनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे आजही जनतेच्या मनात आहे; परंतु घोडा मैदान जवळ असल्यामुळे केलेल्या ‘बनवाबनवी’ला नक्कीच तोंड द्यावे लागणार आहे. बागलाण तालुका हा गुजरात राज्याला लागून असल्यामुळे साहजिकच गुजरातला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून येथील राष्ट्रीय आणि राज्य मार्ग विकसित होत आहे; परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः कोलमडला आहे. तांत्रिक गोष्टींचा अभाव आणि अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या गुणवत्ता नसलेल्या कामामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी दहिवेल ते मंगरूळ फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. दुरुस्तीसाठी आंदोलने झाली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेचे पितळ उघडे पडले. पिंपळनेर -ताहाराबाद-सटाणादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्ताहीन कामामुळे आज तरी दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.

नामपूर-सटाणा रस्त्याचे कामदेखील संथगतीने...

नामपूर-सटाणा रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. हा दहा मीटर रुंदीचा रस्ता ठिकठिकाणी काँक्रीटचा रस्ता व गटारी बांधण्यात येत आहे. कुपखेडा ते चौगाव फाटा रस्त्याचे काम झाले असले तरी पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता उघड झाली आहे. यंत्रणेला नामपूर ते कुपखेडा रस्त्याचे काम अद्याप करता आलेले नाही, त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डे टाळण्याच्या नादात अपघाताची मालिका सुरू आहे. अशी परिस्थिती असतानाही यंत्रणेकडून साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नाही. या रस्त्यावरील तब्बल ३४ शेतकरी मोबदल्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांशी ना संवाद साधला ना कोर्टात आपली बाजू मांडली. या उदासीन धोरणामुळे जनतेचे मात्र नुकसान होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुरवस्था...

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः वाट लागली. वीरगाव ते दसाणे, वीरगाव ते तळवाडे दिगर, मोरकुरे ते पठावे, मुल्हेर ते बोऱ्हाटे, मानूरचे बारा पाडे, हरणबारी ते आंबापूर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वर्दळीचे रस्ते असल्यामुळे मोठी ओरड आहे. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडात असल्याची अधिकाऱ्यांची ओरड आहे. पैसे नसल्याच्या नावाखाली बहुतांश रस्ते दुर्लक्षित असून, त्याचा परिणाम ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेवर होताना दिसत आहे.

फोटो - १७ सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दशा.

170821\17nsk_1_17082021_13.jpg

सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दश