शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

ठेकेदार, अधिकारी यांच्या अभद्र ‘आघाडी’मुळे रस्त्यांची लागली वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST

नितीन बोरसे सटाणा : बागलाण तालुका हा म्हणायला आदिवासी तालुका आहे. मात्र, लागून गुजरात राज्य आणि जिल्हा नाशिक असल्यामुळे ...

नितीन बोरसे

सटाणा : बागलाण तालुका हा म्हणायला आदिवासी तालुका आहे. मात्र, लागून गुजरात राज्य आणि जिल्हा नाशिक असल्यामुळे या शेतीप्रधान तालुक्यातील जनता व्यापारी शेतीकडे आकर्षित झाली आहे. पारंपरिक शेतीला मूठमाती देऊन व्यावसायिक शेतीकडे हा तालुका वळला आहे. त्यामुळे साहजिकच दळणवळणाच्या बाबतीत जनतादेखील जागृत असल्याचे बघायला मिळते. त्यामुळेच मुख्य रस्ता असो वा ग्रामीण रस्ते यांची झालेली दुरवस्था याला अधिकारी आणि ठेकेदार यांची अभद्र आघाडी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत जनतेने संबंधित यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात बसविल्याचे चित्र समोर आहे.

बागलाण हा संवेदनशील तालुका आहे. सोशल मीडियामुळे जग गतिमान झाले आहे. त्यामुळे सटाणा शहराचा बाह्य वळण रस्ता असो वा शिर्डी-साक्री रस्त्याचे चौपदरीकरण याबाबत संधिसाधू मंडळींनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे आजही जनतेच्या मनात आहे; परंतु घोडा मैदान जवळ असल्यामुळे केलेल्या ‘बनवाबनवी’ला नक्कीच तोंड द्यावे लागणार आहे. बागलाण तालुका हा गुजरात राज्याला लागून असल्यामुळे साहजिकच गुजरातला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून येथील राष्ट्रीय आणि राज्य मार्ग विकसित होत आहे; परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः कोलमडला आहे. तांत्रिक गोष्टींचा अभाव आणि अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या गुणवत्ता नसलेल्या कामामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी दहिवेल ते मंगरूळ फाटा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. दुरुस्तीसाठी आंदोलने झाली; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेचे पितळ उघडे पडले. पिंपळनेर -ताहाराबाद-सटाणादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या गुणवत्ताहीन कामामुळे आज तरी दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.

नामपूर-सटाणा रस्त्याचे कामदेखील संथगतीने...

नामपूर-सटाणा रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. हा दहा मीटर रुंदीचा रस्ता ठिकठिकाणी काँक्रीटचा रस्ता व गटारी बांधण्यात येत आहे. कुपखेडा ते चौगाव फाटा रस्त्याचे काम झाले असले तरी पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता उघड झाली आहे. यंत्रणेला नामपूर ते कुपखेडा रस्त्याचे काम अद्याप करता आलेले नाही, त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्डे टाळण्याच्या नादात अपघाताची मालिका सुरू आहे. अशी परिस्थिती असतानाही यंत्रणेकडून साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नाही. या रस्त्यावरील तब्बल ३४ शेतकरी मोबदल्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांशी ना संवाद साधला ना कोर्टात आपली बाजू मांडली. या उदासीन धोरणामुळे जनतेचे मात्र नुकसान होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुरवस्था...

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः वाट लागली. वीरगाव ते दसाणे, वीरगाव ते तळवाडे दिगर, मोरकुरे ते पठावे, मुल्हेर ते बोऱ्हाटे, मानूरचे बारा पाडे, हरणबारी ते आंबापूर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वर्दळीचे रस्ते असल्यामुळे मोठी ओरड आहे. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडात असल्याची अधिकाऱ्यांची ओरड आहे. पैसे नसल्याच्या नावाखाली बहुतांश रस्ते दुर्लक्षित असून, त्याचा परिणाम ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेवर होताना दिसत आहे.

फोटो - १७ सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दशा.

170821\17nsk_1_17082021_13.jpg

सटाणा-चौगाव रस्त्याची झालेली दुर्दश