शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील महामार्गासह रस्त्यांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

पुरुषोत्तम राठोड, घोटी : इगतपुरी तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत ...

पुरुषोत्तम राठोड,

घोटी : इगतपुरी तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची वाट लागते; परंतु ही वाट लागण्याचे कारण पाऊस नाही तर निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने दरवर्षी महामार्गासह तालुक्यातील विविध रस्ते डोकेदुखी बनले आहेत.

दरवर्षी मोठंमोठे खड्डे पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांचे तसेच महामार्गाचे काम होणे गरजेचे असूनही हेतुपुरस्सर स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा डोळेझाक करत आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे कित्येक नागरिकांचा बळी घेतला आहे, तर बहुतांश अधू झाले आहेत. या महामार्गावरील टोल प्रशासन सुस्त बसले असून, रस्त्यांची दुरुस्ती न करता टोलवसुलीत दंग दिसत आहेत. इगतपुरी तालुक्याला जोडणाऱ्या ठाणे, पालघर, नगर जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्ग मुंढेगाव ते कसारा घाट, इगतपुरी शहरातील जुना महामार्ग, घोटी - पिंपळगाव मोर ते भंडारदरा तसेच अस्वली ते नांदूरवैद्य, मुंढेगाव ते अस्वली या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून, अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध लहान-मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाट काढणे मुश्कील झाले आहे.

तालुक्यातील प्रमुख महामार्ग जर खड्ड्यात असेल तर इतर रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी ! मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे फाटा ते कसारा घाटापर्यंत विविध ठिकाणी महामार्गाची चाळण झालेली आहे. महामार्गावरील खड्डे तसेच रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल भरू नका, असा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. मनसेसुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात होती. त्यानंतर टोल प्रशासनाला जाग आली आणि डागडुजी करण्यास सुरुवात केली; परंतु रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकले जात असल्याने उलट अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे

इन्फो

रस्ते काँक्रिटीकरणास मान्यता

घोटी-भंडारदरा मार्गांतर्गत पिंपळगाव मोर, वासाळीदरम्यानचा रस्ता पर्यटन व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई, अलंग-मलंग- कुलंगगड आहेत. टाकेद, खेडभैरव मंदिर, भंडारदरा धरण अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा मोठा राबता असतो. मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यातून येणारी - जाणारी वाहतूक दररोज सुरू असते. या मार्गावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी वारंवार तीन वर्षांपासून सलग दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. नुकतीच त्या रस्त्याला हिरवी झेंडी मिळाली असून, १४ कि.मी.चा पिंपळगाव मोर ते वासाळी ९८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

फोटो- २० इगतपुरी खबरबात

200821\20nsk_8_20082021_13.jpg

फोटो- २० इगतपुरी खबरबात