शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

इगतपुरी तालुक्यातील महामार्गासह रस्त्यांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

पुरुषोत्तम राठोड, घोटी : इगतपुरी तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत ...

पुरुषोत्तम राठोड,

घोटी : इगतपुरी तालुक्यात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होते हे सर्वश्रुत आहे. तरीही या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची वाट लागते; परंतु ही वाट लागण्याचे कारण पाऊस नाही तर निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने दरवर्षी महामार्गासह तालुक्यातील विविध रस्ते डोकेदुखी बनले आहेत.

दरवर्षी मोठंमोठे खड्डे पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांचे तसेच महामार्गाचे काम होणे गरजेचे असूनही हेतुपुरस्सर स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा डोळेझाक करत आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर मोठंमोठ्या खड्ड्यांमुळे कित्येक नागरिकांचा बळी घेतला आहे, तर बहुतांश अधू झाले आहेत. या महामार्गावरील टोल प्रशासन सुस्त बसले असून, रस्त्यांची दुरुस्ती न करता टोलवसुलीत दंग दिसत आहेत. इगतपुरी तालुक्याला जोडणाऱ्या ठाणे, पालघर, नगर जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्ग मुंढेगाव ते कसारा घाट, इगतपुरी शहरातील जुना महामार्ग, घोटी - पिंपळगाव मोर ते भंडारदरा तसेच अस्वली ते नांदूरवैद्य, मुंढेगाव ते अस्वली या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून, अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध लहान-मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाट काढणे मुश्कील झाले आहे.

तालुक्यातील प्रमुख महामार्ग जर खड्ड्यात असेल तर इतर रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी ! मुंबई-आग्रा महामार्गावर गोंदे फाटा ते कसारा घाटापर्यंत विविध ठिकाणी महामार्गाची चाळण झालेली आहे. महामार्गावरील खड्डे तसेच रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल भरू नका, असा आदेश खासदार हेमंत गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. मनसेसुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात होती. त्यानंतर टोल प्रशासनाला जाग आली आणि डागडुजी करण्यास सुरुवात केली; परंतु रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकले जात असल्याने उलट अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे

इन्फो

रस्ते काँक्रिटीकरणास मान्यता

घोटी-भंडारदरा मार्गांतर्गत पिंपळगाव मोर, वासाळीदरम्यानचा रस्ता पर्यटन व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई, अलंग-मलंग- कुलंगगड आहेत. टाकेद, खेडभैरव मंदिर, भंडारदरा धरण अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा मोठा राबता असतो. मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यातून येणारी - जाणारी वाहतूक दररोज सुरू असते. या मार्गावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी वारंवार तीन वर्षांपासून सलग दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. नुकतीच त्या रस्त्याला हिरवी झेंडी मिळाली असून, १४ कि.मी.चा पिंपळगाव मोर ते वासाळी ९८ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

फोटो- २० इगतपुरी खबरबात

200821\20nsk_8_20082021_13.jpg

फोटो- २० इगतपुरी खबरबात