शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खणणाऱ्या ठेकेदाराला अभय

By admin | Updated: September 5, 2015 00:10 IST

बॅरिकेडिंगमुळे खड्डे : स्थानिकांवर कायद्याचा बडगा

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी मंडप वा रस्त्यावर खड्डा खणल्यास पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या महापालिका प्रशासनाने मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी सांगितल्यानुसार भर रस्त्यावर खड्डे खणून बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर कायम ठेवल्याने नुकतेच नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे.कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या दिवशी पोलिसांनी ठेका दिलेल्या बॅरिकेडिंग ठेकेदाराने शहराच्या चहुबाजंूनी बल्ली-बॅरिकेडिंगने मुसक्या आवळताना महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे खणून रस्ते बंद केले. या बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला हा भाग वेगळा असला तरी, प्रत्यक्षात बॅरिकेडिंग काढल्यानंतर ठेकेदाराने केलेले खड्डे मात्र अद्यापही तसेच आहेत. महापालिकेने कुंभमेळ्यानिमित्त शेकडो कोटी रुपये खर्च करून शहरातील अंतर्गत व बाह्य रस्त्यांचे बळकटीकरण केले आहे. आता तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची भविष्यात आर्थिक कारणास्तव डागडुजी होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे सध्या तयार रस्त्यांची अधिकाधिक काळजी घेणे एवढेच महापालिकेच्या हाती आहे. परंतु पहिल्या पर्वणीला बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदाराने अनेक रस्त्यांवर खड्डे खणून केलेल्या बॅरिकेडिंगमुळे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रस्त्यावर मंडप उभारणारे तसेच खड्डे खणण्याबाबत नाशिक महापालिकेने धोरण ठरविले असून, रस्त्यावर एक खड्डा खणल्यास थेट ५० हजार रुपये दंडाची तरतूद त्यात करण्यात आलेली आहे. होऊ घातलेल्या गणेशोत्सव सार्वजनिक मित्र मंडळाला महापालिकेकडून तशी स्पष्ट सूचनाही देण्यात आलेली असून, रस्त्याच्या तोडफोडीवर खास लक्षही ठेवण्यात येणार आहे. याच कारणास्तव महापालिकेने नवीन नळ कनेक्शन देताना रस्त्याची तोडफोड होते म्हणून परवानगी देण्यास नकार सुरू केला आहे. म्हणजे नाशिककरांना कायद्याचा बडगा दाखविण्याची तयारी करणाऱ्या महापालिकेने बल्ली बॅरिकेडिंग करणाऱ्या ठेकेदारावर आपली मेहेरनजर दाखविली असून, अगोदरच पोलिसांकडून बॅरिकेडिंगचा ठेका पदरात पाडून ठेकेदाराने चांगभलं केलेले असताना आता महापालिकाही त्याला अभय देत असल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)