शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

गारपीटग्रस्तांना मदत वाटपात असमतोल आढळल्याने रास्ता रोको येवला-नांदगाव मार्गावर वाहतूक खोळंबली

By admin | Updated: May 14, 2014 22:40 IST

येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी राजापुरात रास्ता रोको.

येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी राजापुरात रास्ता रोको केल्याने येवला-नांदगाव मार्गावरची वाहतूक पाऊण तास खोळंबली, तहसीलदार शरद मंडलिक यांनी ग्रामस्थ, गारपीटग्रस्त आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याने रास्ता रोको मागे घेतला गेला. मार्च महिन्यातील गारपिटीने कांद्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कृषी सहाय्यकासह संबंधितांनी नुकसानीचे पंचनामे घटनास्थळी केले नाहीत त्यामुळे अनुदान वाटपात अनियमितता झाली असल्याचे अंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. पिकांचे नुकसान व मदतीचे आकडे याचा ताळेबंद जुळत नाही यामुळे राजापुरात मोठ्या प्रमाणावर नाराजी झाली.ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडके, भारत वाघ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकर्‍यांनी राजापूरला रास्ता रोको केला.नुकसानीचे फेरपंचनामे व्हावेत व गारपीटग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदनही तहसीलदार मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले.आंदोलनात वाल्मीक घुगे, निवृत्ती वाघ, भाऊसाहेब गरुड, अशोक अव्हाड, सुभाष वाघ, एकनाथ आव्हाड, रामनाथ भाबड, साहेबराव आव्हाड, बबन अलगड, साहेबराव बोडके, रमेश धात्रक, विजय धात्रक यांच्यासह राजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.