शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

गारपीटग्रस्तांना मदत वाटपात असमतोल आढळल्याने रास्ता रोको येवला-नांदगाव मार्गावर वाहतूक खोळंबली

By admin | Updated: May 14, 2014 22:40 IST

येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी राजापुरात रास्ता रोको.

येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी राजापुरात रास्ता रोको केल्याने येवला-नांदगाव मार्गावरची वाहतूक पाऊण तास खोळंबली, तहसीलदार शरद मंडलिक यांनी ग्रामस्थ, गारपीटग्रस्त आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याने रास्ता रोको मागे घेतला गेला. मार्च महिन्यातील गारपिटीने कांद्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कृषी सहाय्यकासह संबंधितांनी नुकसानीचे पंचनामे घटनास्थळी केले नाहीत त्यामुळे अनुदान वाटपात अनियमितता झाली असल्याचे अंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. पिकांचे नुकसान व मदतीचे आकडे याचा ताळेबंद जुळत नाही यामुळे राजापुरात मोठ्या प्रमाणावर नाराजी झाली.ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडके, भारत वाघ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकर्‍यांनी राजापूरला रास्ता रोको केला.नुकसानीचे फेरपंचनामे व्हावेत व गारपीटग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदनही तहसीलदार मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले.आंदोलनात वाल्मीक घुगे, निवृत्ती वाघ, भाऊसाहेब गरुड, अशोक अव्हाड, सुभाष वाघ, एकनाथ आव्हाड, रामनाथ भाबड, साहेबराव आव्हाड, बबन अलगड, साहेबराव बोडके, रमेश धात्रक, विजय धात्रक यांच्यासह राजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.