शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

हक्काच पीक, पण शेतकरी झाले परस्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST

कोट- माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. ...

कोट-

माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. वेळेवर तोड होण्यासाठी नको त्या उपाययोजना कराव्या लागतात. दुष्काळात त्या कारखान्यांना गरज होती. आता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने लागवड वाढली आहे यामुळे यावर्षी ऊस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शिवाजीराव म्हस्के, चेहेडी

कोट-

आपला कारखाना बंद झाला तसा बाहेरच्या कारखान्याला ऊस जातो. पण ते सहजासहजी होत नाही. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा मजुरांची पैशांची मागणी पूर्ण करावी लागते. मागीलवर्षी त्या कारखाने अडीच हजारांचा भाव दिला यावर्षी तर दरही कमी दिला आहे. ॲडव्हान्स नंतर काही मिळेल की नाही याचा काही अंदाज नाही.

- ज्ञानेश्वर गायधनी, पळसे

कोट-

आपला कारखाना सुरू होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत. दरवर्षी ५०० टन ऊस असतो तो जर नोंदणी केलेला असेल तर अडचणी येत नाहीत, पण नोंद केलेली नसेल तर चहापाण्याशिवाय पान हालत नाही अशी स्थिती आहे.

- मोहन गोसावी, नानेगाव

कोट-

सुरुवातीला आमचा ५०० ते ६०० टन ऊस कारखान्याला जायचा, पण कारखाना बंद झाल्यानंतर उसाचे क्षेत्र कमी केले आहे. तरी १५० ते २०० टन ऊस असते. आपण दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यामुळे इतर कारखान्यांकडून होणार छळ सहन करावा लागतो. तेथील अधिकाऱ्यांना काही बोलण्याची सोय नाही. ते त्यांच्या मर्जीनुसार ऊस नेतात. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. आश्वासन देऊनही मागील वर्षी आमचा ऊस गेला नाही शेवटी तो जनावरांच्या कुट्टीसाठी द्यावा लागला.

- कांतीलाल गायधनी, पळसे

कोट-

स्वत:चा ऊस असूनही आज शेतकऱ्यांना पायापडी करावी लागत आहे. अनेकवेळा बाहेरच्या कारखान्याचे ऊसतोड कामगार वेळेवर येत नाहीत. आज मजूर मिळत नाहीत घरात माणसं कमी यामुळे उसाशिवाय दुसरं पीक घेता येत नाही. ठोक पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते, पण त्यासाठी अनेक मोठ्या दिव्यातून जावे लागते.

- भाऊसाहेब गायकवाड, भगूर