शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच पीक, पण शेतकरी झाले परस्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST

कोट- माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. ...

कोट-

माझा दरवर्षी ८०० ते हजार टन ऊस जातो. भाव मिळत असला तरी सगळं परस्वाधीन असल्यासारखी स्थिती आहे. वेळेवर तोड होण्यासाठी नको त्या उपाययोजना कराव्या लागतात. दुष्काळात त्या कारखान्यांना गरज होती. आता सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने लागवड वाढली आहे यामुळे यावर्षी ऊस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- शिवाजीराव म्हस्के, चेहेडी

कोट-

आपला कारखाना बंद झाला तसा बाहेरच्या कारखान्याला ऊस जातो. पण ते सहजासहजी होत नाही. यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा मजुरांची पैशांची मागणी पूर्ण करावी लागते. मागीलवर्षी त्या कारखाने अडीच हजारांचा भाव दिला यावर्षी तर दरही कमी दिला आहे. ॲडव्हान्स नंतर काही मिळेल की नाही याचा काही अंदाज नाही.

- ज्ञानेश्वर गायधनी, पळसे

कोट-

आपला कारखाना सुरू होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करायला हवेत. दरवर्षी ५०० टन ऊस असतो तो जर नोंदणी केलेला असेल तर अडचणी येत नाहीत, पण नोंद केलेली नसेल तर चहापाण्याशिवाय पान हालत नाही अशी स्थिती आहे.

- मोहन गोसावी, नानेगाव

कोट-

सुरुवातीला आमचा ५०० ते ६०० टन ऊस कारखान्याला जायचा, पण कारखाना बंद झाल्यानंतर उसाचे क्षेत्र कमी केले आहे. तरी १५० ते २०० टन ऊस असते. आपण दुसऱ्या जिल्ह्यातील असल्यामुळे इतर कारखान्यांकडून होणार छळ सहन करावा लागतो. तेथील अधिकाऱ्यांना काही बोलण्याची सोय नाही. ते त्यांच्या मर्जीनुसार ऊस नेतात. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. आश्वासन देऊनही मागील वर्षी आमचा ऊस गेला नाही शेवटी तो जनावरांच्या कुट्टीसाठी द्यावा लागला.

- कांतीलाल गायधनी, पळसे

कोट-

स्वत:चा ऊस असूनही आज शेतकऱ्यांना पायापडी करावी लागत आहे. अनेकवेळा बाहेरच्या कारखान्याचे ऊसतोड कामगार वेळेवर येत नाहीत. आज मजूर मिळत नाहीत घरात माणसं कमी यामुळे उसाशिवाय दुसरं पीक घेता येत नाही. ठोक पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते, पण त्यासाठी अनेक मोठ्या दिव्यातून जावे लागते.

- भाऊसाहेब गायकवाड, भगूर