शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

चौकट या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी नाशिकरोड बसस्थानक -बसस्थानक आणि रेल्वेस्टेशन जवळच असल्याने या परिसरात अनेक रिक्षा अस्ताव्यस्तपणे उभ्या राहातात. ...

चौकट

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी

नाशिकरोड बसस्थानक -बसस्थानक आणि रेल्वेस्टेशन जवळच असल्याने या परिसरात अनेक रिक्षा अस्ताव्यस्तपणे उभ्या राहातात. अनेकवेळा तर थेट बसस्थानकाच्या आवारात रिक्षा घुसविल्या जातात. वारंवार प्रवाशांना कुठे जायचे याची विचारणा केली जाते. यामुळे अनेक प्रवासी त्रस्त होत असतात.

नाशिकरोड ते शालीमार - नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोड ते शालीमार दरम्यान अनेक वसाहती आहेत. या मार्गावर अनेक रिक्षाचालक कधी लेफ्ट कधी राईटने मनमानी पद्धतीने रिक्षा चालवित असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा तर होतोचज; पण अनेकवेळा प्रवाशांचाही नेमके कोणत्या रिक्षात बसावे असा गोंधळ उडतो. या मार्गावर अनेक रिक्षाचाल प्रवाशांची चढउतार करत असतात.

निमाणी बसस्थानक - निमाणी बसस्थानक परिसरातही रिक्षाचालकांनी मनमानी सुरू असते. या ठिकाणी रस्ता अरुंद त्यात सुरू असलेली शहर वाहतुकीच्या बसेसची ये-जा यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. अनेकवेळा बसस्थानकाच्या प्रवेशव्दारासमोरच रिक्षा उभ्या केल्या जातात किंवा प्रवासी उतरविले जातात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची पळवापळवी सुरू असते.

चौकट-

मनमानी भाडे

शहरात टेरीफप्रमाणे आणि शेअरिंग अशा दोन्ही पद्धतीने रिक्षा वाहतूक सुरू आहे. विशेषत: मीटरप्रमाणेच भाडे आकारावे असा नियम असला तरी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत असतात. कोविडनंतर तर अनेक ठिकाणचे भाडे वाढविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

चौकट-

प्रवाशांना त्रास

कोट-

एखाद्या बसस्थानकावर दोन प्रवासी उभे असले तरी त्याठिकाणी अनेक रिक्षाचालक थांबतात. काहीवेळा तर रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकाला कुठे जायचे आहे, याचे उत्तर देऊन प्रवासी त्रस्त होतात. पाच मिनिटेही शांत उभे राहू दिले जात नाही. - प्रशांत पवार, प्रवासी

कोट-

आपल्याला जिकडे जायचे असते त्या भागात अनेक रिक्षाचालक जात नसले तरी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागते. काहीवेळा तर सुट्या पैशांवरून तर खूप कटकट होते. - योगेश जाधव, प्रवासी

कोट-

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांना प्रवासी भाडे वाढवून देण्यात आलेले नाही. पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय गाड्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे परिवहन अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने रिक्षाची दरवाढ करायला हवी - हैदर सय्यद, भद्रकाली ऑटोरिक्षा युनियन

कोट-

गेल्या अनेक वर्षांपासून मीटरची भाडेवाढ न झाल्याने मीटरप्रमाणे चालणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे. हकीम समितीने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे दरवाढ झाल्यास रिक्षाचालकांना व्यवसाय करणे सोयीचे होईल. - शिवाजी भोर, रिक्षा युनियन