शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजावर

By admin | Updated: April 6, 2017 02:04 IST

नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.

नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचे तुकडे होत असून जागतिक हवामान बदलामुळे शेती अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतीतील नुकसानीमुळे अन्नदाता बळीराजा कोलमडून पडण्याआधीच त्याला आधार देण्याची गरज असून, शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे बुधवारी (दि. ५) आयोजित सोहळ्यात ‘गिरणा गौरव पुरस्कार २०१७’ चे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, समीरन वाळवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे माध्यमांनीही कृषी क्षेत्राला वाहिलेले सदर, वृत्तपत्रांसोबतच, राज्यस्तरावर मराठी भाषिक कृषी वाहिनी सुरू करण्याची गरज व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आनंद अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून समर्थन दिले. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘राज्य म्हणे जनतेचे’ आणि ‘आई’ कविता सादर केली. दरम्यान, अहिरे यांच्या ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ‘वाटचाल’ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक वैशाली अहिरे यांनी, तर सूत्रसंचालन किशोरी केनीकर यांनी केले.