शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजावर

By admin | Updated: April 6, 2017 02:04 IST

नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.

नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचे तुकडे होत असून जागतिक हवामान बदलामुळे शेती अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतीतील नुकसानीमुळे अन्नदाता बळीराजा कोलमडून पडण्याआधीच त्याला आधार देण्याची गरज असून, शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे बुधवारी (दि. ५) आयोजित सोहळ्यात ‘गिरणा गौरव पुरस्कार २०१७’ चे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, समीरन वाळवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे माध्यमांनीही कृषी क्षेत्राला वाहिलेले सदर, वृत्तपत्रांसोबतच, राज्यस्तरावर मराठी भाषिक कृषी वाहिनी सुरू करण्याची गरज व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आनंद अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून समर्थन दिले. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘राज्य म्हणे जनतेचे’ आणि ‘आई’ कविता सादर केली. दरम्यान, अहिरे यांच्या ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ‘वाटचाल’ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक वैशाली अहिरे यांनी, तर सूत्रसंचालन किशोरी केनीकर यांनी केले.