शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजावर

By admin | Updated: April 6, 2017 02:04 IST

नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.

नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचे तुकडे होत असून जागतिक हवामान बदलामुळे शेती अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतीतील नुकसानीमुळे अन्नदाता बळीराजा कोलमडून पडण्याआधीच त्याला आधार देण्याची गरज असून, शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे बुधवारी (दि. ५) आयोजित सोहळ्यात ‘गिरणा गौरव पुरस्कार २०१७’ चे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, समीरन वाळवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे माध्यमांनीही कृषी क्षेत्राला वाहिलेले सदर, वृत्तपत्रांसोबतच, राज्यस्तरावर मराठी भाषिक कृषी वाहिनी सुरू करण्याची गरज व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आनंद अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून समर्थन दिले. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘राज्य म्हणे जनतेचे’ आणि ‘आई’ कविता सादर केली. दरम्यान, अहिरे यांच्या ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ‘वाटचाल’ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक वैशाली अहिरे यांनी, तर सूत्रसंचालन किशोरी केनीकर यांनी केले.