शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा आदर राखा

By admin | Updated: March 9, 2017 01:55 IST

नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही

 नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही. महिलांना त्या करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचे कौतुक अपेक्षित असते, दखल घेणे अपेक्षित असते, असे मत सनदी लेखापाल, वास्तुविशारद, विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अ‍ॅडव्होकेट, डॉक्टर, स्पेस एज्युकेटर, पोलीस उपनिरीक्षक, उद्योजक, आयकर आयुक्त यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.‘लोकमत’ आणि ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया, नाशिक शाखा’ यांच्या वतीने झालेल्या या राउंड टेबलमध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाचा ताळमेळ, वाढते घटस्फोट, महिलांचे समाजातील स्थान, महिलांसाठी करिअरच्या नवनव्या संधी या विविध विषयांवर विविध प्रकारची मते व्यक्त झाली. वास्तुविशारद सारख्या क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी केलेल्या कामाचा अभ्यास केला जातो. ताणतणावावर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे असल्याचे मत वास्तुविशारद रुपाली जायखेडकर यांनी व्यक्त केले. विशिष्ट कामे महिलांनीच करावी, असे गृहीत न धरता सर्व कामांची जबाबदारी घरातील प्रत्येक सदस्याची असेल असे नियोजन करावे, आपल्या घराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी सांघिकतेने कामे करावीत, असे मत डॉ. चारुता बापये यांनी व्यक्त केले. मुला-मुलींवर केलेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. त्यांना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगितल्यास ते घटस्फोटापर्यंत येणार नाहीत, असे मत सनदी लेखापाल अर्चना जांगडा यांनी व्यक्त केले.मातांनी आपल्या मुलांना महिलांप्रती आदराने वागण्याची शिकवण देणे गरजेचे असून महिलांबाबतीत ते संवेदनशील असल्यास तिच्याही सुख-दु:खात समरस होऊ शकतील, असे मत सनदी लेखापाल मधुरा ठक्कर यांनी व्यक्त केले. नोकरी-व्यवसायाप्रमाणेच घरही महत्त्वाचे आहे याचे भान महिलांनी ठेवल्यास घटस्फोटापर्यंत वेळ जाणार नाही. घर-नोकरी दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करावा, असे मत सोनाली चांडक यांनी व्यक्त केले. हल्लीची मुलं-मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत असून कुठे, कोणाशी कसे वागावे याचे त्यांना भान उरलेले नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तणुकीचा मागोवा घ्यावा, असे मत विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लग्न करण्यापूर्वीच मुला-मुलींचे समुपदेशन करून द्यावे व त्यांना येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यावी, असे मत मेहता पेट्रोलपंपच्या संचालिका शर्मिला मेहता यांनी व्यक्त केले. चुकीच्या पद्धतीने शिकविल्या जाणाऱ्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेवर नव्याने काम करण्याची वेळ आली असून, वाढत्या घटस्फोटांचा समाजाने गांभिर्याने विचार करावा, असे मत अ‍ॅड. राजश्री बालाजीवाले यांनी व्यक्त केले. महिलेच्या प्रगतीत कुटुंबाचा पाठिंबा, सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, असे मत स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी व्यक्त केले. हल्लीच्या तरुणाईमध्ये सहनशक्ती राहिली नसल्याने आणि नकार पचवायची सवयच नसल्याने घटस्फोटांबरोबरच आत्महत्त्या, ताणतणाव, मानसिक-शारीरिक आजार यांचेही प्रमाण वाढले असल्याचे मत प्रा. सोनाली चिंधडे यांनी व्यक्त केले. हल्लीची पिढी निरनिराळ्या क्षेत्रात भराऱ्या घेत असली तरी त्यांच्यामध्ये दृढनिश्चयाचा अभाव दिसतो. भविष्यात काय करायचे आहे याचे पालक आणि पाल्य दोघांकडेही चित्र स्पष्ट असायला हवे, असे मत सनदी लेखापाल रेखा पटवर्धन यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)