शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

कोट्यवधीची जागा देण्याचा ठराव झाला ‘विखंडित’

By admin | Updated: August 15, 2014 00:33 IST

गोवर्धन ग्रामपंचायतीचा प्रताप, पंचायत समिती अंधारातच

 

गणेश धुरी

नाशिकराज्य सरकारकडून शैक्षणिक संस्थेसाठी कोट्यवधीच्या जागा कवडीमोेल दराने करारावर मिळवून आणखी दोन एकर जागा नाशिक तालुक्यातील एका ग्रामपंचायतीकडून कवडीमोल दराने घेण्याचा एका शैक्षणिक संस्थेचा डाव अगदी मोक्याच्या क्षणी बारगळला. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा जागा देण्याचा ठराव विखंडित करून या प्रकरणाला चाप लावल्याने कोट्यवधी रुपये किमतीची ग्रामपंचायतीची दोेन एकर जागा खासगी होण्यापासून वाचली आहे.विशेष म्हणजे, एखाद्या ग्रामपंचायतीने एखाद्या संस्थेला करारावर जागा देण्याचा ठराव संमत केल्यानंतर तो रीतसर संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाच्या मंजुरीनंतर मग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर मान्यतेसाठी ठेवला जातो. मात्र प्रस्तुत प्रकरणात ग्रामपंचायतीने संबंधित संस्थेला जागा देण्याचा ठराव केल्यानंतर सरळ मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर मान्यतेसाठी ठेवला (पान ९ वर)आणि सभेतच तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशी जागा देता येत नाही असे सांगूनही तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. मात्र विभागीय आयुक्तांनी हा ठराव विखंडित केल्याने ही कोट्यवधी रुपयांची जागा देण्याचा डाव सपेशल अपयशी ठरला.नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि गंगापूर धरणाजवळ नाशिक-गिरणारे रस्त्यावर गोवर्धन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सरकारी गट नं. ४८ पैकी ९० आर क्षेत्र जागा मूळची धुळे येथील कॉँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील या नेत्याशी निगडित असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांना देण्याबाबत गोवर्धन ग्रामपंचायतीने ठराव संमत केला. त्या ठरावानुसार ही जागा संबंधित संस्थेला देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या २७ आॅगस्ट २०१३ च्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचेच सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी ठराव मांडला. त्यास कॉँग्रेसचेच सदस्य सोमनाथ फडोळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ठराव क्रमांक ३५७ हा संमत करण्यात आला. मात्र त्याच सभेत उपस्थित असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रणधीर सोमवंशी यांनी १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत हद्दीतील जागा कोणत्याही संस्थेस देता येत नाही, असे स्पष्ट केले. मात्र ठराव मंजूर झाला असल्याने त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने हा ठराव विखंडित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्यावर विभागीय आयुक्तांनी आता काही दिवसांपूर्वीच संबंधित ठराव विखंडित करण्याचा निर्णय घेतला असून, तशी माहिती जिल्हा परिषदेला कळविली आहे. मुळातच शासन निर्णयानुसार अशी जागा देत येत नसल्याचे स्पष्ट असताना, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद स्तरावर अशी जागा देण्याबाबतची भूमिका का घेण्यात आली आणि त्यामागे नेमका राजकीय दबाव होता काय याची आता चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी सुरू केली आहे. जिल्ह्यात यापूर्वीही शैक्षणिक संस्थांना कवडीमोल कराराने जागा देण्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत, हे विशेष.