शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

विकासासाठी संशोधनात्मक अभियांत्रिकीची गरज

By admin | Updated: October 15, 2016 02:20 IST

विकासासाठी संशोधनात्मक अभियांत्रिकीची गरज

 नाशिक : विविध क्षेत्रांत काम करणारे इंजिनिअर्स ‘विश्वकर्मा’ यांची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे अभियंत्यांनी संशोधनात्मक व निमिर्तीक्षम काम करण्याची गरज असल्याचे मत निर्लेप कंपनीचे संचालक तथा महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक शाखेतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना शुक्रवारी (दि. १४) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष राम भोगले यांच्यासह दि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नााशिक लोकल सेंटरचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिंवसरा, विपुल मेहता, अजित पाटील, आयोजक समिती अध्यक्ष नरेंद्र बिरार, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अविनाश चिंतावार आदि उपस्थित होते. रामचंद्र भोगले म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची नक्कल केली तर तत्कालीन विकास दिसत असला तरी तो दीर्घकाळ टिकत नाही. मनुष्यबळ म्हणून काम करताना वयाबरोबर कामही बंद होतं. हीच अवस्था चीनसारख्या देशाची झाल्याचे त्यांनी सांगितले. तर बदलत्या काळानुसार नावीन्यपूर्ण संशोधन केल्यास त्यापासून रॉयल्टीच्या रूपाने कायमस्वरूपी पैसा मिळण्याचा मार्ग खुला होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रोजगारासंबंधी चर्चा होताना नेहमी केवळ मर्यादित स्वरूपात होत असल्याने ही समस्या कायम आहे. बेरोजगारीची कारणे शोधून रोजगार निर्मितीसाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीची गरज आहे. त्यादृष्टीने सध्याच्या सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे मत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. शासकीय आणि सामाजिक नीतिमूल्ये जपताना कौटुंबिक नातीही जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)