शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच उपचाराने पक्षघातावर उपाय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे. या आजाराची लक्षणे सहजगत्या लक्षात येण्यासारखी असून, रुग्णांनी अशी लक्षणे लक्षात येताच शक्य तितक्या लवकर आवश्यक तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेतल्यास या आजारावर उपचार शक्य असल्याचे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे. या आजाराची लक्षणे सहजगत्या लक्षात येण्यासारखी असून, रुग्णांनी अशी लक्षणे लक्षात येताच शक्य तितक्या लवकर आवश्यक तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेतल्यास या आजारावर उपचार शक्य असल्याचे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पक्षघात झालेल्या रु ग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीटी स्कॅन करावे लागते. त्यानंतर उपचार करण्यासाठी तो नॉर्मल असायला हवा. पहिल्या साडेचार तासांत रु ग्णावर उपचार सुरू केल्यास ३० ते ४० टक्के रु ग्ण बरा होऊ शकतो. अलीकडे जंकफुड, ताणतणाव अशा बदलत्या जीवनशैलींमुळे या रु ग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, हृदयाच्या आजारांमुळे पक्षघात होऊ शकतो. अचानक वेड्यासारखे वागणे हेदेखील त्याचेच लक्षण असू शकते. या आजारावरील उपचार महागडे असल्याचे म्हटले जाते; मात्र वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यास नंतर बराचसा पैसा खर्चूनही उपयोग होत नाही. त्यामुळे अशाप्रक ारे पक्षघाताच्या झटक्याची लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी उपचाराची घाई करणे गरजेचे आहे.पक्षघाताची लक्षणेमेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मेंदूच्या पेशी मृत पावतात.मेंदूच्या कोणत्या भागात आघात होतो यावर पक्षघाताची लक्षणे अवलंबून असतात.ही लक्षणे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. यात चेंहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे अथवा लुळा पडणे, वाचा जाणे, बोलण्यामध्ये तोतरेपणा येणे, अचानक अंधुकपणा येणे अथवा दृष्टी जाणे, अचानक डोके गरगरणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून येतात.मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झालेल्या कोशिकांचा रक्तपुरवठा पहिल्या साडेचार तासातच सुरळीत केला असता बहुतांश कोशिका मृत होण्यापासून वाचवता येतात. त्यामुळे ब्रेन अटॅकची तीव्रता कमी होते किंवा ब्रेन अटॅकच्या लक्षणांमध्ये लवकर सुधार होण्यास मदत होते.- डॉ. विजय घुगे,मेंदू विकारतज्ज्ञ, नाशिक