शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वेळीच उपचाराने पक्षघातावर उपाय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे. या आजाराची लक्षणे सहजगत्या लक्षात येण्यासारखी असून, रुग्णांनी अशी लक्षणे लक्षात येताच शक्य तितक्या लवकर आवश्यक तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेतल्यास या आजारावर उपचार शक्य असल्याचे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकार तज्ज्ञांनी दिला आहे. या आजाराची लक्षणे सहजगत्या लक्षात येण्यासारखी असून, रुग्णांनी अशी लक्षणे लक्षात येताच शक्य तितक्या लवकर आवश्यक तपासण्या करून वैद्यकीय उपचार घेतल्यास या आजारावर उपचार शक्य असल्याचे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पक्षघात झालेल्या रु ग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सीटी स्कॅन करावे लागते. त्यानंतर उपचार करण्यासाठी तो नॉर्मल असायला हवा. पहिल्या साडेचार तासांत रु ग्णावर उपचार सुरू केल्यास ३० ते ४० टक्के रु ग्ण बरा होऊ शकतो. अलीकडे जंकफुड, ताणतणाव अशा बदलत्या जीवनशैलींमुळे या रु ग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, हृदयाच्या आजारांमुळे पक्षघात होऊ शकतो. अचानक वेड्यासारखे वागणे हेदेखील त्याचेच लक्षण असू शकते. या आजारावरील उपचार महागडे असल्याचे म्हटले जाते; मात्र वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यास नंतर बराचसा पैसा खर्चूनही उपयोग होत नाही. त्यामुळे अशाप्रक ारे पक्षघाताच्या झटक्याची लक्षणे जाणवल्यास रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी उपचाराची घाई करणे गरजेचे आहे.पक्षघाताची लक्षणेमेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मेंदूच्या पेशी मृत पावतात.मेंदूच्या कोणत्या भागात आघात होतो यावर पक्षघाताची लक्षणे अवलंबून असतात.ही लक्षणे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. यात चेंहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे अथवा लुळा पडणे, वाचा जाणे, बोलण्यामध्ये तोतरेपणा येणे, अचानक अंधुकपणा येणे अथवा दृष्टी जाणे, अचानक डोके गरगरणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून येतात.मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झालेल्या कोशिकांचा रक्तपुरवठा पहिल्या साडेचार तासातच सुरळीत केला असता बहुतांश कोशिका मृत होण्यापासून वाचवता येतात. त्यामुळे ब्रेन अटॅकची तीव्रता कमी होते किंवा ब्रेन अटॅकच्या लक्षणांमध्ये लवकर सुधार होण्यास मदत होते.- डॉ. विजय घुगे,मेंदू विकारतज्ज्ञ, नाशिक