शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

समाजाभिमुख सिद्धांतांचा राज्यकर्त्यांना विसर

By admin | Updated: March 18, 2015 00:33 IST

अनिल सद्गोपाल : ‘शिक्षणाचे माध्यम आणि बाजार’ यावर विश्लेषण

नाशिक : भारतीयांचा मातृभाषेविषयीचा विश्वास संपुष्टात आणून इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे भारतावर सत्ता भोगली. दरम्यानच्या काळात इंग्रजी भाषा, इंग्रजी विचारधारा, इंग्रजी जीवनशैलीचे प्रस्थ वाढविण्याचा त्यांनी पूरेपूर प्रयत्न केला. त्याचा प्रभाव आजही भारतात प्रकर्षाने जाणवतो, हे खेदाने सांगावे लागत आहे. ब्रिटिश साम्राज्यवादापुढे भारतीय महान नेत्यांनी मांडलेल्या शिक्षणशास्त्राविषयीच्या मूळ समाजाभिमुख प्रगतिशील सिद्धांतांचाही आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांना विसर पडला असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल सद्गोपाल यांनी केले.शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व एस. एस. जोशी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून सद्गोपाल बोलत होते. हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ‘भाषिक विविधता, शिक्षणाचे माध्यम व बाजार’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, इंग्रजी भाषेशिवाय आधुनिक विचार अन्य भाषांमधून मांडण्याचे सामर्थ्य नसल्याचा विचार १८३५ साली लॉर्ड मॅकेले याने पुढे आणला. त्याने या विचाराने सर्वप्रथम भारतीयांचे मातृभाषेशी नाते तोडले. भारतातील सर्व भाषा इंग्रजी भाषेसमोर भारतीयांकडून दुय्यम समजल्या जाऊ लागल्या आहेत. एकूणच आजच्या या आधुनिकतेच्या युगात भारतीयांना आपापल्या मातृभाषेवरचा विश्वासही उडाला असल्याचे सद्गोपाल यांनी सांगितले. दरम्यान, मातृभाषेविषयीचा अभिमान आणि विश्वास अधिक बळकट करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या महान नेत्यांच्या साहित्याचा अभ्यास गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी देत त्यांचे मातृभाषेविषयीचे प्रेम अधोरेखित करणारे विविध दाखलेही सांगितले. आजदेखील इंग्रज साम्राज्यवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून कायम ठेवला जात असून, त्याला स्थानिक राज्यकर्तेही हातभार लावत आहेत. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातही भांडवलशाही फोफावत चालली असल्याचे सद्गोपाल यावेळी म्हणाले. व्यासपीठावर प्रदीपकुमारदास गुप्ता, छाया देव, श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. संतोष म्हस्के, सचिन मालेगावकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)