शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

समाजाभिमुख सिद्धांतांचा राज्यकर्त्यांना विसर

By admin | Updated: March 18, 2015 00:33 IST

अनिल सद्गोपाल : ‘शिक्षणाचे माध्यम आणि बाजार’ यावर विश्लेषण

नाशिक : भारतीयांचा मातृभाषेविषयीचा विश्वास संपुष्टात आणून इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे भारतावर सत्ता भोगली. दरम्यानच्या काळात इंग्रजी भाषा, इंग्रजी विचारधारा, इंग्रजी जीवनशैलीचे प्रस्थ वाढविण्याचा त्यांनी पूरेपूर प्रयत्न केला. त्याचा प्रभाव आजही भारतात प्रकर्षाने जाणवतो, हे खेदाने सांगावे लागत आहे. ब्रिटिश साम्राज्यवादापुढे भारतीय महान नेत्यांनी मांडलेल्या शिक्षणशास्त्राविषयीच्या मूळ समाजाभिमुख प्रगतिशील सिद्धांतांचाही आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांना विसर पडला असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल सद्गोपाल यांनी केले.शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व एस. एस. जोशी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून सद्गोपाल बोलत होते. हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ‘भाषिक विविधता, शिक्षणाचे माध्यम व बाजार’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, इंग्रजी भाषेशिवाय आधुनिक विचार अन्य भाषांमधून मांडण्याचे सामर्थ्य नसल्याचा विचार १८३५ साली लॉर्ड मॅकेले याने पुढे आणला. त्याने या विचाराने सर्वप्रथम भारतीयांचे मातृभाषेशी नाते तोडले. भारतातील सर्व भाषा इंग्रजी भाषेसमोर भारतीयांकडून दुय्यम समजल्या जाऊ लागल्या आहेत. एकूणच आजच्या या आधुनिकतेच्या युगात भारतीयांना आपापल्या मातृभाषेवरचा विश्वासही उडाला असल्याचे सद्गोपाल यांनी सांगितले. दरम्यान, मातृभाषेविषयीचा अभिमान आणि विश्वास अधिक बळकट करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या महान नेत्यांच्या साहित्याचा अभ्यास गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी देत त्यांचे मातृभाषेविषयीचे प्रेम अधोरेखित करणारे विविध दाखलेही सांगितले. आजदेखील इंग्रज साम्राज्यवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून कायम ठेवला जात असून, त्याला स्थानिक राज्यकर्तेही हातभार लावत आहेत. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातही भांडवलशाही फोफावत चालली असल्याचे सद्गोपाल यावेळी म्हणाले. व्यासपीठावर प्रदीपकुमारदास गुप्ता, छाया देव, श्रीधर देशपांडे, अ‍ॅड. संतोष म्हस्के, सचिन मालेगावकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)