शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

By admin | Updated: May 25, 2014 00:14 IST

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरीकरणामुळे रोजच शेकडो नागरिक रोजगाराच्या शोधासाठी नाशिकमध्ये येतात आणि याच शहरात वास्तव्यास राहतात. निवार्‍यासाठी असे नागरिक झोपडप˜्यांचा आधार घेतात. प्रामुख्याने नदीकाठीच अशाप्रकारे झोपड्या होतात आणि त्या वाढतात. शहरात अशा अनेक झोपडप˜्या असून, त्या हटवणे पालिकेला शक्य झालेले नाही. गोदाकाठी मल्हारखाण झोपडप˜ी अशीच वसली गेली आणि आता अधिकृतही झाली आहे. परंतु तेथेही झोपड्या वाढत चालल्या आहेत. नासर्डी नदीलगत तर अशा मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. सातपूर येथील महादेववाडी, कांबळेवाडी या झोपडप˜्या अशाच प्रकारे वसल्या असून, त्या आयटीआय पूल आणि त्यापलीकडेदेखील वाढल्या आहेत. मुंबई नाका आणि त्यानंतर आता शिवाजीवाडी अशाच प्रकारे वाढत आहे. एरव्ही ही नदी बारमाही नसल्याने अडचण उद्भवत नाही. परंतु पावसाळ्यात पुराच्या पाण्याने घरे आणि झोपड्या वाहून जाण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकदा जीवित हानी होते. तरीही झोपडप˜्या बांधायचे थांबत नाही. त्यामुळे केवळ  अतिक्रमणे रोखणार कोण?महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग स्वतंत्र आहे. परंतु या विभागामार्फत अशा प्रकारे अतिक्रमण होऊच नये, यासाठी कोणतेही परिश्रम घेतले जात नाही. परिणामी हा प्रश्नही सुटत नाही. घरकुल योजनेचा पर्यायही दूरचनदीपात्रातील धोकादायक झोपडप˜ीवासीयांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरे देण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. परंतु अनेक नागरिकांकडे पुरावा नाही आणि समजा घरे दिलीच तरी पुन्हा याच ठिकाणी झोपडप˜्या वाढणार नाहीत, याची शाश्वती नाही.