शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

रिफ्लेक्टर न लावलेले ट्रॅक्टर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:36 IST

पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.

ठळक मुद्दे अपघाताला आमंत्रण : बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावरील अन्य वाहनांना धोका

पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. पिंपळगाव परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले असून, या अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेकजण अजूनही त्या अपघातामुळे त्रास सहन करत आहे. यातून या प्रश्नाचे गांभीर्य समोर येते. साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टर्सना प्राधान्य देण्यात येते.मात्र वाहनचालकांना वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जात नाही. साखर प्रशासनाचे वचक ट्रॅक्टरचालक याच्यावर नसल्याने बेफिकिरीने बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. त्याचबरोबर ट्रॅक्टरमालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात.उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर्संच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाइटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात......चौकट..काही दिवसांपूर्वी ‘पडलं तर व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतो’, असा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये उसाने ओव्हरलोडेड झालेला ट्रॅक्टर कोसळतो. ट्रॅक्टरमध्ये क्षमता नसताना ऊस भरण्यात आला होता. याचा गांभीर्याने विचार करणे आणि त्यावर कृती होणे गरजेचे आहे............................विनारिफ्लेक्टर वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेत डबल ट्राली लावून जात असतात त्यामुळे अपघात होत असतात.सुरक्षा सप्ताह केवळ दिखाऊ नको...उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो. मात्र, आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही, असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसत नाही....या करता येतील उपाययोजनाऊस वाहतुकीच्या वाहनांना सेवा रस्ता सक्तीचा करावा, सर्व वाहनांना सुरक्षेच्या उपाययोजना सक्तीच्या कराव्यात, विनारिफ्लेक्टर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक बंदीचा विचार व्हावा, ऊस वाहतुकीसह इतर वाहने पार्किंगला बंधने घालावीत, हॉटेलजवळील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करावी.(25पिंपळगाव टृॅक्टर)