शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील धरणांमधील विसर्गात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST

मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील १२ जलप्रकल्पांमधून विसर्ग ...

मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील १२ जलप्रकल्पांमधून विसर्ग करण्याची वेळ आली. त्यामुळे नदी, नाले तसेच ओढ्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्लादेखील देण्यात आला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातूनदेखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर दारणा, वालदेवी मधूनही हजारो क्युसेकपाणी सोडले जात होते. आता पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र विसर्ग कमी करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी दारणा धरणातून ७२००, कडवामधून ८४८, आळंदीमधून ८०, वालदेवी धरणातून ५९९ तर गंगापूर धरणातून १६५९ पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणांमधून सुरू करण्यात आलेला विसर्ग कायम असताना दुपारी तीन वाजता यामध्ये कपात करण्यात आली. दारणा धरणातून २६७२ क्युकेस इतका विसर्ग करण्यात आला तर कडवामधील विसर्ग वाढविण्याची वेळ आली. धरण क्षेत्रात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे १२७२ पर्यंत विसर्ग वाढवावा लागला. सायंकाळी ३ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गात कपात करून ११०६ इतका विसर्ग करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता त्यामध्ये अधिक कपात होऊन अवघे ५५३ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.