शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

जिल्ह्यातील धरणांमधील विसर्गात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST

मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील १२ जलप्रकल्पांमधून विसर्ग ...

मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील १२ जलप्रकल्पांमधून विसर्ग करण्याची वेळ आली. त्यामुळे नदी, नाले तसेच ओढ्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्लादेखील देण्यात आला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातूनदेखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर दारणा, वालदेवी मधूनही हजारो क्युसेकपाणी सोडले जात होते. आता पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र विसर्ग कमी करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी दारणा धरणातून ७२००, कडवामधून ८४८, आळंदीमधून ८०, वालदेवी धरणातून ५९९ तर गंगापूर धरणातून १६५९ पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणांमधून सुरू करण्यात आलेला विसर्ग कायम असताना दुपारी तीन वाजता यामध्ये कपात करण्यात आली. दारणा धरणातून २६७२ क्युकेस इतका विसर्ग करण्यात आला तर कडवामधील विसर्ग वाढविण्याची वेळ आली. धरण क्षेत्रात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे १२७२ पर्यंत विसर्ग वाढवावा लागला. सायंकाळी ३ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गात कपात करून ११०६ इतका विसर्ग करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता त्यामध्ये अधिक कपात होऊन अवघे ५५३ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.