शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

कादवाची ५ लाख क्विंटल विक्रमी साखर निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST

यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले ...

यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले आहे.

नुकताच हंगाम संपला असून १७७ दिवसांत ४ लाख ४४ हजार १५७ मे. टन उसाचे गाळप होत पाच लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. सरासरी साखर उतारा ११.२६ राहिला आहे. प्रतिदिन १२५० मे.टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येऊन गाळप क्षमता २५०० मे.टन करण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामात कोरोनाचे सावट व सातत्याने हवामान बदल होत झालेल्या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसला. मार्च मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ऊसतोड मजूर कमी झाल्याने व आहे त्या मजुरांची उन्हामुळे कार्यक्षमता कमी झाल्याने काही दिवस हंगाम लांबला. अनेक अडचणींवर मात करत अखेर १७७ दिवसांत गळीत हंगामाची सांगता झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते शेवटच्या ऊस मोळीचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक कार्यकारी संचालक हेमंत माने, सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, संचालक तसेच कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.

केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेतले असून आगामी हंगामापर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.

- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा