शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कादवाची ५ लाख क्विंटल विक्रमी साखर निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST

यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले ...

यंदा सातत्याने दर महिन्याला पडणारा पाऊस व मार्चपासून कोरोना प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीवर मात करत कादवाने विक्रमी गाळप केले आहे.

नुकताच हंगाम संपला असून १७७ दिवसांत ४ लाख ४४ हजार १५७ मे. टन उसाचे गाळप होत पाच लाख क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. सरासरी साखर उतारा ११.२६ राहिला आहे. प्रतिदिन १२५० मे.टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येऊन गाळप क्षमता २५०० मे.टन करण्यात आली. यंदाच्या गाळप हंगामात कोरोनाचे सावट व सातत्याने हवामान बदल होत झालेल्या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसला. मार्च मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ऊसतोड मजूर कमी झाल्याने व आहे त्या मजुरांची उन्हामुळे कार्यक्षमता कमी झाल्याने काही दिवस हंगाम लांबला. अनेक अडचणींवर मात करत अखेर १७७ दिवसांत गळीत हंगामाची सांगता झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या हस्ते शेवटच्या ऊस मोळीचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक कार्यकारी संचालक हेमंत माने, सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, संचालक तसेच कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.

केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेतले असून आगामी हंगामापर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कादवाची गाळप कार्यक्षमता वाढली असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस लागवड करावी.

- श्रीराम शेटे, अध्यक्ष, कादवा