शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

स्वागताध्यक्षांनी टोचले आयोजकांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST

नाशिक : साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या ३९ समित्यांमध्ये अजून काही नाराजांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे ...

नाशिक : साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या ३९ समित्यांमध्ये अजून काही नाराजांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याचे समजल्यानंतर, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आयोजक लोकहितवादी मंडळाचे कान टोचले. या समित्यांमध्ये भारुडभरती करून केवळ समित्यांतील स्वयंसेवकांची यादी वाढविण्यापेक्षा आहे, त्या पदाधिकाऱ्यांनी कामाचा जोर वाढवून संमेलनाच्या तयारीला अजून वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.

साहित्य संमेलनासाठी केवळ ४ ते ५ हजार नागरिक येतील, असा प्राथमिक अंदाज बांधून त्याचे नियोजन आयोजक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. त्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या ३९ समित्यांमध्ये केवळ तीन व्यक्तींची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, हळूहळू काही कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवत, तर काहींनी नाराजी व्यक्त करीत आपापल्या आवडीच्या क्षेत्रात नावे समाविष्ट करण्याबाबतचा हट्ट धरला. त्या पार्श्वभूमीवर कुणालाही नाराज करायचे नाही, अशीच काहीशी भूमिका घेण्यात आल्याने, या समित्यांमधील सदस्यांची संख्या फेब्रुवारीच्या मध्यावरच ८५०च्या आसपास पोहोचलेली आहे.

इन्फो

त्यांच्या खर्चाचा भार कुणावर?

आताच ही संख्या ८५० वर गेली असून, त्यात अजून शे-दीडशे जणांची भरती केल्यास, ती संख्या १ हजारावर जाणार आहे, तसेच संमेलन काळात तर शालेय, महाविद्यालयीन एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शेकडो पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, यांच्याही भोजन, फराळाची व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे. त्या परिस्थितीत ही सर्व संख्याच दीड ते दोन हजारांच्या आसपास गेल्यास त्यांच्या खर्चाचा भुर्दंड विनाकारणच आयोजकांवर पडणार असल्याने तो खर्च कुणी उचलायचा, असा सवालही स्वागताध्यक्षांनी उपस्थित केला.

इन्फो

अन्यथा समितीतील सदस्यांकडून शुल्क

अनेक सदस्यांनी समित्यांमध्ये केवळ नावे नोंदवून घेण्यातच धन्यता मानलेली आहे. त्यातील अनेक जण अद्यापही संमेलन स्थळाकडे किंवा कोणत्याही मीटिंगला अद्याप एकदाही आलेले नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना सदस्यत्व का दिले, अशी विचारणाही त्यांनी केली. समित्यांमधील हे भरतीसत्र थांबवा, अन्यथा या समित्यांमधील सदस्यांकडूनही किमान हजार रुपये शुल्क आकारण्याचे निर्देशच स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी दिले आहेत.