शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

राज ठाकरे नाशिककरांवर नाराज

By admin | Updated: March 11, 2017 01:42 IST

नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

 नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान करत यापुढे लोकांना जे हवे त्याचा पुरवठा करणारे उद्वेगजनक भाव मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केल्याने मनसेच्या नाशिकमधील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कामे करूनही मते न मिळाल्याने नाशिककरांवर राज नाराज झाल्याने मनसेने साकारलेल्या प्रकल्पांच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात एकूणच निकालावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठिकठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये नाशिकमधील मनसेच्या प्रकल्पांचे सादरीकरण करत विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे मते मागितली होती. राज यांच्या या प्रचाराची चांगली हवाही तयार झाली होती. परंतु, प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत मनसेला मागील निवडणुकांच्या तुलनेत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेने ९७ उमेदवार रिंगणात उतरविले होते. मात्र, केवळ ५ उमेदवारांनाच विजयाला गवसणी घालता आली. नाशिकप्रमाणेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणीही मनसेला झटका बसत संख्याबळ घटले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रथमच राज ठाकरे यांनी छोटेखानी भाषण करताना पराभवाचे धक्कादायक विश्लेषण केले आणि पक्षाची आगामी वाटचाल कोणत्या पाऊलवाटेवरून असेल, याचे संकेतही दिले. मात्र, ज्या शहरात विकासाचे प्रकल्प राबविले तेथील मतदारांनी नाकारल्याने राज नाराज झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मनसेने साकारलेले बॉटनिकल गार्डन, इतिहास वस्तू संग्रहालय, वॉटर कर्टन, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, शंभर फुटी कारंजा या प्रकल्पांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांची पक्षाकडून काळजी वाहिली जाईल की नाही, याबाबत तर्कवितर्कला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)