शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

‘पावसाळी गटार’ कुचकामी

By admin | Updated: July 21, 2016 22:48 IST

ठिकठिकाणी साचतेय पाणी : नाशिककर भोगतोय सदोष योजनेचे दुष्परिणाम

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेने शहरात सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून ‘पावसाळी गटार योजना’ राबविली, परंतु या योजनेची नेमकी उपयुक्तता काय, याचे कोडे आजपर्यंत नाशिककरांना उलगडलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघडे पडत आले आहे. परंतु, महापालिका प्रशासन त्याच्यापासून धडा शिकायला तयार नाही आणि लोकप्रतिनिधीही त्याबाबत फारसे गंभीर नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी दि. १० जुलै रोजी झालेल्या पावसाने गंगापूर धरण एकाच दिवसात २७ टक्क्यांनी भरले आणि शहरातही जागोजागी पावसाच्या पाण्याची तळी साचली. दोन आठवड्यांनंतरही पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेची पावसाळी गटार योजना किती कुचकामी ठरली आहे, याचा प्रत्यय येतो.आजवर महापालिकेमार्फत ज्या काही योजना राबविल्या गेल्या त्यात सर्वाधिक रकमेच्या म्हणजे सुमारे ४०० कोटी रुपयांच्या ‘पावसाळी गटार’ योजनेचा समावेश होतो. महापालिकेच्या सुकाणू समितीने केंद्र व राज्य सरकारकडे ३२८ कोटी ३३ लाख रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यात शासनाने कपात करत ती ३१० कोटींवर आणली होती. महापालिकेने निविदाप्रक्रिया राबवून योजनेच्या ६१ कामांना सन २००७ मध्ये मंजुरी दिली होती. सदर योजना राबविण्यापूर्वी त्यावर टीकाही भरपूर झाली होती. नाशिकची भौगोलिक स्थिती पाहता पावसाचे पाणी वाहून नेण्याइतपत ही योजना उपयुक्त ठरेल काय, असे प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, योजनेचे अनेक फायदे पटवून देत प्रशासनाने शहरात सदर योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरात ३०५ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याला मंजुरी मिळाली होती. योजनेसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला होता. कोणतेही नियोजन न करता ही योजना साकारण्यात आल्याने अनेक आरोपही झाले. गैरव्यवहार-भ्रष्टाचारामुळे योजना गाजली. अधीक्षक अभियंत्याचे निलंबनही झाले होते. सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी सदर योजना पूर्णत्वाला गेली; परंतु ती संपूर्ण शहरात नव्हे तर ठरावीक भागातच राबविण्यात आली. मात्र आतापर्यंत या योजनेचा नेमका काय फायदा झाला, याचे कोडे नाशिककरांना आजपर्यंत सुटलेले नाही. दर पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचा अनुभव नाशिककर घेत आले आहेत. ज्या भागात पावसाळी गटार योजना राबविली गेली नाही तेथील अवस्था तर भयावह आहे, परंतु जेथे योजना राबविली तेथील स्थिती तर आणखी अवघड बनलेली आहे. पाण्याचा निचराच होत नसल्याने आजही अनेक भागात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेली तळी पहायला मिळतात.