शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नाशिक जिल्ह्यात पावसाचा दणका; पिकांवर रोगराईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST

जिल्ह्यात काही तालुक्यात साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, कांदा रोपे आदी पिके धोक्यात आली ...

जिल्ह्यात काही तालुक्यात साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, कांदा रोपे आदी पिके धोक्यात आली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रिमझिम पावसाने तग धरून राहिलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, कांदारोपे लागणीला आली असताना सततच्या पावसाने रोपे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच मूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पन्न घटणार असून, नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसाने जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढते आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून संततधारेमुळे सुरगाणा तालुक्यातील नार नदीला आलेल्या पुरात तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील खिर्डी भाटीचा खिरपाडा येथील रामजू प्रधान कुवर (६५) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह दि.१७ रोजी हाती लागला. नांदगाव येथेही शाखांबरी नदीला पूर आला आहे, तर मालेगाव येथे संततधारेमुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळून नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत.