शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप ...

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिनीद्वारे खोऱ्यातील बंधारे भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवली आहे. मात्र, सर्वत्र जोरदार पडणाऱ्या पावसाने सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात हुलकावणी दिल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाळा शेवटच्या चरणात आला असतानाही परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत. त्यामुळे खोऱ्यातील खरिपाबरोबरच रबी हंगामाचे नियोजन कोलमडत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

अशा परस्थितीत नायगाव खोऱ्यातील गावांसाठी वरदान ठरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मुख्य जलवाहिनी गेलेल्या गावातील नद्यांमध्ये सोडून परिसरातील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील दारणा व कडवा धरण सध्या ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणांमधून विसर्गही केला जात आहे. या सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील बांधारे भरण्यासाठी करावा.

दारणा धरणाच्या पाण्यावरच जीवन प्राधिकरणाची योजना सुरू आहे. याच योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे परिसरातील मोह-मोहदरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव व देशवंडी आदी गावांतील बांधारे नद्यांद्वारे भरून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी प्रदीप गिते, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, उपररपंच सुमन कापडी, जायगाच्या सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, वडझिरेच्या सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, पांडुरंग बोडके, ब्राह्मणवाडेचे सरपंच कैलास गिते, उपसरपंच सुमन गिते, मोहचे सुदाम बोडके आदींसह नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(२१ नायगाव बंधारा)

-----------------------

सर्वत्र धुवाधार पडत असलेला पाऊस सिन्नर तालुक्यात अजूनही रुसलेला असल्यामुळे खरीप व रबीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत ज्याप्रमाणे कडवाचे पूरपाण्याचे आवर्तन सोडून सिन्नरच्या पूर्व भागाला लाभ दिला याच धर्तीवर दारणाचे वाया जाणाऱ्या पाण्याने नायगाव खोऱ्यातील बंधारे जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे भरून दिले, तर या परिसरातील खरीप व रबी हंगामास दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व तालुका लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा.

-प्रदीप गिते, सामाजिक कार्यकर्ते, वडझिरे

210921\21nsk_19_21092021_13.jpg

२१ नायगाव बंधारा