शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप ...

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिनीद्वारे खोऱ्यातील बंधारे भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवली आहे. मात्र, सर्वत्र जोरदार पडणाऱ्या पावसाने सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात हुलकावणी दिल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाळा शेवटच्या चरणात आला असतानाही परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत. त्यामुळे खोऱ्यातील खरिपाबरोबरच रबी हंगामाचे नियोजन कोलमडत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

अशा परस्थितीत नायगाव खोऱ्यातील गावांसाठी वरदान ठरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मुख्य जलवाहिनी गेलेल्या गावातील नद्यांमध्ये सोडून परिसरातील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील दारणा व कडवा धरण सध्या ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणांमधून विसर्गही केला जात आहे. या सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील बांधारे भरण्यासाठी करावा.

दारणा धरणाच्या पाण्यावरच जीवन प्राधिकरणाची योजना सुरू आहे. याच योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे परिसरातील मोह-मोहदरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव व देशवंडी आदी गावांतील बांधारे नद्यांद्वारे भरून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी प्रदीप गिते, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, उपररपंच सुमन कापडी, जायगाच्या सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, वडझिरेच्या सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, पांडुरंग बोडके, ब्राह्मणवाडेचे सरपंच कैलास गिते, उपसरपंच सुमन गिते, मोहचे सुदाम बोडके आदींसह नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(२१ नायगाव बंधारा)

-----------------------

सर्वत्र धुवाधार पडत असलेला पाऊस सिन्नर तालुक्यात अजूनही रुसलेला असल्यामुळे खरीप व रबीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत ज्याप्रमाणे कडवाचे पूरपाण्याचे आवर्तन सोडून सिन्नरच्या पूर्व भागाला लाभ दिला याच धर्तीवर दारणाचे वाया जाणाऱ्या पाण्याने नायगाव खोऱ्यातील बंधारे जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे भरून दिले, तर या परिसरातील खरीप व रबी हंगामास दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व तालुका लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा.

-प्रदीप गिते, सामाजिक कार्यकर्ते, वडझिरे

210921\21nsk_19_21092021_13.jpg

२१ नायगाव बंधारा