शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप ...

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिनीद्वारे खोऱ्यातील बंधारे भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवली आहे. मात्र, सर्वत्र जोरदार पडणाऱ्या पावसाने सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात हुलकावणी दिल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाळा शेवटच्या चरणात आला असतानाही परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत. त्यामुळे खोऱ्यातील खरिपाबरोबरच रबी हंगामाचे नियोजन कोलमडत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

अशा परस्थितीत नायगाव खोऱ्यातील गावांसाठी वरदान ठरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मुख्य जलवाहिनी गेलेल्या गावातील नद्यांमध्ये सोडून परिसरातील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील दारणा व कडवा धरण सध्या ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणांमधून विसर्गही केला जात आहे. या सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील बांधारे भरण्यासाठी करावा.

दारणा धरणाच्या पाण्यावरच जीवन प्राधिकरणाची योजना सुरू आहे. याच योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे परिसरातील मोह-मोहदरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव व देशवंडी आदी गावांतील बांधारे नद्यांद्वारे भरून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी प्रदीप गिते, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, उपररपंच सुमन कापडी, जायगाच्या सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, वडझिरेच्या सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, पांडुरंग बोडके, ब्राह्मणवाडेचे सरपंच कैलास गिते, उपसरपंच सुमन गिते, मोहचे सुदाम बोडके आदींसह नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(२१ नायगाव बंधारा)

-----------------------

सर्वत्र धुवाधार पडत असलेला पाऊस सिन्नर तालुक्यात अजूनही रुसलेला असल्यामुळे खरीप व रबीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत ज्याप्रमाणे कडवाचे पूरपाण्याचे आवर्तन सोडून सिन्नरच्या पूर्व भागाला लाभ दिला याच धर्तीवर दारणाचे वाया जाणाऱ्या पाण्याने नायगाव खोऱ्यातील बंधारे जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे भरून दिले, तर या परिसरातील खरीप व रबी हंगामास दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व तालुका लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा.

-प्रदीप गिते, सामाजिक कार्यकर्ते, वडझिरे

210921\21nsk_19_21092021_13.jpg

२१ नायगाव बंधारा