शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप ...

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिनीद्वारे खोऱ्यातील बंधारे भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवली आहे. मात्र, सर्वत्र जोरदार पडणाऱ्या पावसाने सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात हुलकावणी दिल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाळा शेवटच्या चरणात आला असतानाही परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत. त्यामुळे खोऱ्यातील खरिपाबरोबरच रबी हंगामाचे नियोजन कोलमडत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

अशा परस्थितीत नायगाव खोऱ्यातील गावांसाठी वरदान ठरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मुख्य जलवाहिनी गेलेल्या गावातील नद्यांमध्ये सोडून परिसरातील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील दारणा व कडवा धरण सध्या ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणांमधून विसर्गही केला जात आहे. या सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील बांधारे भरण्यासाठी करावा.

दारणा धरणाच्या पाण्यावरच जीवन प्राधिकरणाची योजना सुरू आहे. याच योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे परिसरातील मोह-मोहदरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव व देशवंडी आदी गावांतील बांधारे नद्यांद्वारे भरून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी प्रदीप गिते, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, उपररपंच सुमन कापडी, जायगाच्या सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, वडझिरेच्या सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, पांडुरंग बोडके, ब्राह्मणवाडेचे सरपंच कैलास गिते, उपसरपंच सुमन गिते, मोहचे सुदाम बोडके आदींसह नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(२१ नायगाव बंधारा)

-----------------------

सर्वत्र धुवाधार पडत असलेला पाऊस सिन्नर तालुक्यात अजूनही रुसलेला असल्यामुळे खरीप व रबीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत ज्याप्रमाणे कडवाचे पूरपाण्याचे आवर्तन सोडून सिन्नरच्या पूर्व भागाला लाभ दिला याच धर्तीवर दारणाचे वाया जाणाऱ्या पाण्याने नायगाव खोऱ्यातील बंधारे जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे भरून दिले, तर या परिसरातील खरीप व रबी हंगामास दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व तालुका लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा.

-प्रदीप गिते, सामाजिक कार्यकर्ते, वडझिरे

210921\21nsk_19_21092021_13.jpg

२१ नायगाव बंधारा