शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात ‘रेनकोटचे’ भिंजत घोेंगडे

By admin | Updated: July 17, 2016 01:39 IST

आदिवासी विकास : दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

नाशिक : आधी निविदा मागवायच्या आणि नंतर निविदेला फाटा देऊन परस्पर खरेदी प्रक्रिया राबवायची, असा काहीसा प्रकार आदिवासी विकास आयुक्तालयाने केला आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे दोन लाख विद्यार्थी ऐन पावसाळ्यातही ‘चिंब’ भिजतच शिक्षणाचे धडे गिरवित असल्याचे वृत्त आहे.सोलापूर वगळता राज्यभरातील आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या चार अपर आयुक्त कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या २८ प्रकल्पांमधील हा घोळ मिटलेला नाही. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने या पावसाळ्यात सुमारे एक लाख ९० हजार विद्यार्थ्यांना पावसाळ्यापासून बचावासाठी रेनकोट खरेदी करण्यासाठी ८ ते १६ जून दरम्यान निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. २१ जून रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या. दरम्यानच्या काळात निविदा संपुष्टात येण्याच्या तारखेच्या दिवशीच म्हणजे १६ जून रोजी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांचे पत्र आदिवासी विकास आयुक्तालयास प्राप्त झाले. त्यात सोलापूर प्रकल्प वगळता अन्य सर्व प्रकल्पांत २५ जूनच्या आत रेनकोटचा पुरवठा करणे शक्य होत नसल्याने तीन लाखांच्या मर्यादेच्या आत रेनकोट खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या प्रकल्पातील मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात यावे, असे म्हटले होते. तीन लाखांच्या पुढे ई-निविदा बंधनकारक असल्याने बहुधा तीन लाखांपर्यंतचेच अधिकार मुख्याध्यापकांना प्रदान करून आदिवासी विकास विभागाने ई-निविदांपासून पळवाट काढल्याचे बोलले जाते. नाशिक प्रकल्पांतर्गत या रेनकोट पुरवठ्यासाठी एकूण १० निविदा विभागाला प्राप्त झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात ई-निविदा पद्धतीने रेनकोटचा पुरवठा करण्यासाठी स्पर्धेत असलेल्या सुपर पॉलिमर कंपनीने या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने आता आदिवासी विकास विभागाला मुख्याध्यांपकारवी खरेदी करण्याऐवजी या रेनकोटसाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)