शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

तालुक्यातील माळमाथा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या, परंतु जोरदार ...

तालुक्यातील माळमाथा भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या, परंतु जोरदार पाऊस नसल्याने, त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. काही शेतकऱ्यांनी उशिरा खरिपाची पेरणी केली, अशा शेतकऱ्यांच्या पिकांना रिपरिप पावसाने जीवदान मिळाले असून, मुसळधार पाऊस न झाल्याने, शेतकऱ्यांच्या विहिरींना पुरेसे पाणी नाही. नद्या-नाले तुडुंब भरून वाहिले, तर विहिरींना पाणी येईल. दरम्यान, परिसरातील शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त झाला असून, शहरात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. काही शेतकरी काढलेला कांदा चाळीत साठवत असून, कांदा पावसाने भिजून नुकसान होऊ नये, म्हणून प्लास्टीक कागद खरेदी करताना दिसत आहेत.

तालुक्यातील बंधारेही कोरडे असून, काही गावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. शहर परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील रस्ते उद्ध्वस्त झाले असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात साठून चिखल झाला आहे. त्यात निसटून अपघात होत आहेत, तर नववसाहतींमध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.