शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

पर्जन्यासाठी ‘बाणेश्वराला’ जलाधिवास

By admin | Updated: June 28, 2016 00:15 IST

पर्जन्यासाठी ‘बाणेश्वराला’ जलाधिवास

 नाशिक : जून महिना उलटूनही केवळ नाशिक जिल्ह्यात दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार हजेरी लावण्यासाठी सोमवारी (दि.२७) रामकुंडावरील बाणेश्वर मंदिरात गंगा गोदावरी पुरोहित संघ व आदिवासी जीवरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेश्वराला साकडे घालण्यात आले असून, शिवलिंग पाण्याखाली ठेवण्यात आले आहे. म्हणजेच जलाधिवास करण्यात आला आहे.यंदा नाशिककरांना कधी नव्हे एवढ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागले आहे. राज्यात अन्यत्र पावसाला सुरूवात झाली असली तरी नाशिकमध्ये मात्र अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे बाणेश्वराला साकडे घालण्यात आले आहे. यावेळी बाणेश्वराला रामकुंडातील पाणी टाकून संपूर्णपूणे पाण्याखाली ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी गंगा गोदावरी पुरोहित संघ व आदिवासी जीवरक्षक दल यांचे पदाधिकारी सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, आलोक गायधनी, राजाभाऊ गायधनी, सदानंद देव आदिंसह कपालेश्वर भक्त मंडळींनी बाणेश्वर मंदिरात गणपती पूजन, पुण्यवाचन, नंतर रुद्राभिषेक आदि पूजापाठ करण्यात येऊस बाणेश्वराची मूर्ती रामकुंडातील पाण्याने बुडविण्यात आली. मंदिराच्या सभोवताली काटेरी झुडपे लावून पांढरे पडदे लावण्यात आले. यापूर्वी आॅगस्ट २००८ मध्ये असाच बाणेश्वराला जलाधिवास करण्यात आल्यानंतर सप्टेंबर २००८ मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत गोदावरीला महापूर आला होता. आताही पावसाने नाशिककडे पाठ फिरविल्याने आणि जून महिना उलटत आला तरी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने नाशिककर चिंतित आहेत. दिवसातून एकवेळा पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दमदार पाऊस झाल्यास ही पाणीकपात बंद होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)जून महिना संपत आल्याने पावसासाठी आसुसलेल्या नाशिककरांची तगमग वाढली आहे. आता थेट सृष्टीकर्त्यालाच साकडे घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पर्जन्यवृष्टीसाठी नाशिकमध्ये पवित्र रामकुंड येथील ‘बाणेश्वराला’च असे पाण्यात ठेवण्यात आले आहे. पाऊस पडेपर्यंत देवाला जलाधिवासातच ठेवले जाणार आहे.