शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सारे कसे शांत शांत..!

By admin | Updated: February 20, 2017 00:24 IST

आचारसंहितेची भीती : सायंकाळनंतर भोंगे बंद, फलक उतरविले

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता झाली आणि ध्वनिवर्धकांचा आवाज शांत झाला. प्रचार फलक उतरविले गेले. उमेदवारांचे एसएमएस थांबले त्यामुळे सायंकाळनंतर ‘सारे कसे शांत शांत’ असे वाटू लागले.  महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने राजकीय फलक हटविले. मात्र, त्यानंतर अधिकृत उमेदवारांनी ठिकठिकाणी फलक लावले होते. प्रचाराच्या कालावधीत सकाळ होत नाही तोच मोटारींमधून प्रचाराची गाणी आणि मतदारांना आवाहन करणारे भोंगे सुरू होत. सुरवातीला हे सारे सुसह्य होते, परंतु दिवसभर अशाप्रकारची प्रचार करणाऱ्या मोटारी धावत असल्याने नागरिकांना शेवट शेवट हा प्रचार अडचणीचा ठरला. विशेषत: दहावी - बारावीला पाल्य असलेल्या पालकांना या प्रचाराचा वीट आला होता. अभ्यासाच्या वेळी या प्रचाराचा व्यत्यय येत होता. त्यातच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे घरोघर आगमन, पत्रकांचे वाटप जोरात सुरू होते. एकावेळी चार उमेदवार आणि त्यांचे समर्थक असे किमान पन्नास जणांचे कार्यकर्ते घरोघर जात असल्याने आणि एकेक उमेदवार दोन ते चार वेळा फिरकत असल्याने नागरिकही प्रचार संपण्याचीच जणू वाट बघत होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता झाली आणि कर्णककर्श आवाजातील तोच तो प्रचार थांबला. जाहीर प्रचार थांबल्याने उमेदवारांच्या समर्थकांनी तातडीने प्रचार फलक हटविण्यास प्रारंभ झाला आणि सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास फलक पूर्णत: हटविला गेल्याने शहर स्वच्छ झाले. उमेदवारांचे एसएमएस आणि व्हॉट््स अ‍ॅप प्रचारही बऱ्यापैकी थांबला आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)