शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

संजय शहाणे इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत ...

संजय शहाणे

इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे महापालिका गंभीरपणे पाहत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनधिकृत भंगार गुदामांमुळे अनेक अवैध प्रकार सुरू राहत असल्यामुळेदेखील आगीच्या घटत असल्याची चर्चा आहे.

वडाळा गाव परिसरात अनधिकृत भंगार गुदामांमुळे या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगार गुदामांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी असतानाही महापालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. या गुदामांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास येथील अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. विशेष म्हणजे येथील भंगार गुदामांच्या मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने गुदामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. शेतीमध्ये गुलाबाची फुले, द्राक्ष आणि पालेभाज्या अशी पिके निघत होते. जमिनीचा भाव जसजसा वाढत गेला तसतशी शेती विकली गेली. त्या ठिकाणी घरे तयार होण्यास सुरुवात झाली. परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गुंठेवार पद्धतीने जागा घेऊन त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. अंबड लिंक रोड येथील भंगार बाजार हटविण्यात आल्याने तेथील काही भंगार व्यावसायिकांनी परिसरात गुदामे उभारली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे नगर व मेहबूबनगर परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक वेळेस भंगार गुदामांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदर गुदामे हे भर वस्तीत असल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहेत. मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता लोक वस्तीतून भंगार बाजार हटविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

चौकट -

रिसायकलिंगच्या प्रक्रियेमुळे आग लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भंगार बाजाराला राजकीय वरदहस्त असल्याने भंगार हटविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात भंगार गुदामे टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. व्यावसायिक नको असलेला माल बाहेर जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-घसा या आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिकवरील प्रक्रियेमुळे प्रदूषणही वाढत आहे.