शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

संजय शहाणे इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत ...

संजय शहाणे

इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे महापालिका गंभीरपणे पाहत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनधिकृत भंगार गुदामांमुळे अनेक अवैध प्रकार सुरू राहत असल्यामुळेदेखील आगीच्या घटत असल्याची चर्चा आहे.

वडाळा गाव परिसरात अनधिकृत भंगार गुदामांमुळे या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगार गुदामांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी असतानाही महापालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. या गुदामांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास येथील अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. विशेष म्हणजे येथील भंगार गुदामांच्या मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने गुदामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. शेतीमध्ये गुलाबाची फुले, द्राक्ष आणि पालेभाज्या अशी पिके निघत होते. जमिनीचा भाव जसजसा वाढत गेला तसतशी शेती विकली गेली. त्या ठिकाणी घरे तयार होण्यास सुरुवात झाली. परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गुंठेवार पद्धतीने जागा घेऊन त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. अंबड लिंक रोड येथील भंगार बाजार हटविण्यात आल्याने तेथील काही भंगार व्यावसायिकांनी परिसरात गुदामे उभारली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे नगर व मेहबूबनगर परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक वेळेस भंगार गुदामांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदर गुदामे हे भर वस्तीत असल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहेत. मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता लोक वस्तीतून भंगार बाजार हटविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

चौकट -

रिसायकलिंगच्या प्रक्रियेमुळे आग लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भंगार बाजाराला राजकीय वरदहस्त असल्याने भंगार हटविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात भंगार गुदामे टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. व्यावसायिक नको असलेला माल बाहेर जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-घसा या आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिकवरील प्रक्रियेमुळे प्रदूषणही वाढत आहे.