शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

संजय शहाणे इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत ...

संजय शहाणे

इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे महापालिका गंभीरपणे पाहत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनधिकृत भंगार गुदामांमुळे अनेक अवैध प्रकार सुरू राहत असल्यामुळेदेखील आगीच्या घटत असल्याची चर्चा आहे.

वडाळा गाव परिसरात अनधिकृत भंगार गुदामांमुळे या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगार गुदामांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी असतानाही महापालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. या गुदामांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास येथील अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. विशेष म्हणजे येथील भंगार गुदामांच्या मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने गुदामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. शेतीमध्ये गुलाबाची फुले, द्राक्ष आणि पालेभाज्या अशी पिके निघत होते. जमिनीचा भाव जसजसा वाढत गेला तसतशी शेती विकली गेली. त्या ठिकाणी घरे तयार होण्यास सुरुवात झाली. परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गुंठेवार पद्धतीने जागा घेऊन त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. अंबड लिंक रोड येथील भंगार बाजार हटविण्यात आल्याने तेथील काही भंगार व्यावसायिकांनी परिसरात गुदामे उभारली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे नगर व मेहबूबनगर परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक वेळेस भंगार गुदामांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदर गुदामे हे भर वस्तीत असल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहेत. मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता लोक वस्तीतून भंगार बाजार हटविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

चौकट -

रिसायकलिंगच्या प्रक्रियेमुळे आग लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भंगार बाजाराला राजकीय वरदहस्त असल्याने भंगार हटविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात भंगार गुदामे टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. व्यावसायिक नको असलेला माल बाहेर जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-घसा या आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिकवरील प्रक्रियेमुळे प्रदूषणही वाढत आहे.