शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

संजय शहाणे इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत ...

संजय शहाणे

इंदिरानगर - वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात लोकवस्तीत असलेल्या भंगार गुदामांना वारंवार आग लागल्याच्या घटना घडत असतानाही त्याकडे महापालिका गंभीरपणे पाहत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनधिकृत भंगार गुदामांमुळे अनेक अवैध प्रकार सुरू राहत असल्यामुळेदेखील आगीच्या घटत असल्याची चर्चा आहे.

वडाळा गाव परिसरात अनधिकृत भंगार गुदामांमुळे या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भंगार गुदामांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भंगार बाजाराबाबत अनेक तक्रारी असतानाही महापालिका केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. या गुदामांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास येथील अनधिकृत व्यवसायाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. विशेष म्हणजे येथील भंगार गुदामांच्या मालकांकडून चिरीमिरी घेतली जात असल्याने गुदामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. शेतीमध्ये गुलाबाची फुले, द्राक्ष आणि पालेभाज्या अशी पिके निघत होते. जमिनीचा भाव जसजसा वाढत गेला तसतशी शेती विकली गेली. त्या ठिकाणी घरे तयार होण्यास सुरुवात झाली. परिसरात लोकवस्ती वाढत गेली. गुंठेवार पद्धतीने जागा घेऊन त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे सत्तरच्या घरात गेली आहे. अंबड लिंक रोड येथील भंगार बाजार हटविण्यात आल्याने तेथील काही भंगार व्यावसायिकांनी परिसरात गुदामे उभारली. त्यामुळे अण्णा भाऊ साठे नगर व मेहबूबनगर परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक वेळेस भंगार गुदामांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. सदर गुदामे हे भर वस्तीत असल्याने आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव करीत आहेत. मोठी दुर्घटना होण्याची वाट न बघता लोक वस्तीतून भंगार बाजार हटविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

चौकट -

रिसायकलिंगच्या प्रक्रियेमुळे आग लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भंगार बाजाराला राजकीय वरदहस्त असल्याने भंगार हटविण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरात भंगार गुदामे टाकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. व्यावसायिक नको असलेला माल बाहेर जाळत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-घसा या आजाराला सामोरे जावे लागत आहे. प्लॅस्टिकवरील प्रक्रियेमुळे प्रदूषणही वाढत आहे.