शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

दहावी परीक्षेच्या गुणवत्ता मूल्यांकनावर पालकांचे प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

बरे झाले परीक्षा रद्द झाली. वर्षभरापासून ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना आता लिहिण्यापेक्षा टाइपिंगची सवय झाली आहे. लिहिण्याचा सराव ...

बरे झाले परीक्षा रद्द झाली. वर्षभरापासून ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना आता लिहिण्यापेक्षा टाइपिंगची सवय झाली आहे. लिहिण्याचा सराव राहिला नाही. लिहिताना मुलांना त्रास होतोय. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द केली ते योग्यच झाले. कोरोनाचे भूत मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे परीक्षा घेणेदेखील योग्य नव्हते. परीक्षाबाबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय योग्य आहे. - प्रवीण कासार पालक, कळवण

दहावीची प्रत्यक्ष परीक्षा न घेता केवळ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल देण्याचा शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला असला तरी ते केवळ कागदावर मूल्यमापन होणार आहे. त्यात पारदर्शकता असणार नाही त्यामुळे मुलांची बौद्धिक गुणवत्ता समजणार नाही. वर्षभर मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले, मात्र स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्प, विज्ञान प्रयोग हे शिक्षकांनी प्रत्यक्ष पाहिले नाही. त्यामुळे याचे मूल्यमापन कसे करणार, विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार न्याय मिळायला हवा.

- डॉ. बापू खालकर, पालक, सायखेडा

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने गुणवत्तेवर फरक पडण्याची भीती निर्माण झाली आहे. नववीच्या मूल्यांकनानुसार गुणवत्ता ठरली तर हुशार विद्यार्थी वर्गाला जी गुण टक्केवारी अपेक्षित आहे त्यावर परिणाम होऊन विद्यार्थी नाराज होतील. गुणवत्ता यामुळे कमी पडली तर मेरिट यादीमध्ये नंबर लावताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. पाचवी ते नववीपर्यंतची गुणवत्ता पाहून गुण टक्केवारी ठरवावी. जेणेकरून विद्यार्थी वर्गात नाराजी होणार नाही.

- रतन मेसट, पालक, लखमापूर

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन अभ्यास केला होता. परीक्षेची तयारी केली होती. मात्र कोरोनामुळे परिक्षेबाबत संभ्रमावस्था होती. राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षेसाठी निवडलेला मार्ग अन्यायकारक आहे. वर्षभर दुसरा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागणार आहे, यामुळे विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे,

- रवींद्र शेवाळे, पालक, मालेगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असून, याबाबत शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांचे सहामाही परिक्षेच्या गुणांच्या आधारावर मूल्यमापन करणार का, यामध्ये विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षादेखील महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत पुढील वर्गाची तयारी करावी.

- गोरख सामोरे. पालक, वंजारवाडी

मागील वर्षापासून लॉकडाऊनमुळे ऑनलाइन अभ्यास सुरू होता. परंतु शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची अंगवळणी पडलेली सवय, त्यामुळे ऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा येत होता. परीक्षा झाली असती तरी कोरोनाची मनात धास्ती होतीच, यामुळे परीक्षेतही मन लागले नसते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे.

- सृष्टी शिंदे, विद्यार्थिनी, देवळा

शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय योग्य व विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्त्व दिले आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. त्यांच्या अभ्यासावर मात्र पाणी फिरले आहे. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेला या निर्णयामुळे प्राधान्य मिळेल की नाही, असा प्रश्‍न आहे,

- ओमकार गायकवाड, विद्यार्थी, चांदवड