शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पुढच्या सिंहस्थात गोदावरीचे शुद्धीकरण

By admin | Updated: February 22, 2015 00:19 IST

देवेंद्र फडणवीस : निधी कमी न पडू देण्याचा पुनरुच्चार

  नाशिक : विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने काही तरी चुका होणारच, परंतु अशा चुकांमधून मार्ग काढून चांगल्यात चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न सरकार करेल व आगामी बारा वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभ संपताच दुसऱ्या दिवसापासून केले जाईल, अशी घोषणा करून आत्तापासूनच नियोजन केल्यास आगामी कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन निश्चित घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विविध साधु-महंतांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा सर्वात मोठे पर्व आहे. हे पर्व पूर्णपणे सफल करण्याची ताकद सरकारमध्ये नाही, तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरामध्ये आहे, सरकार फक्त सेवकाच्या भूमिकेत आहे. विद्यमान सरकारला कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे काही तक्रारी वा नाराजी असू शकते; परंतु अशाही परिस्थितीत नियोजनात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनासाठी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व इतके मोठे असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला धार्मिक तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्याची गरज नाही, असे सांगून आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभमेळा संपताच दुसऱ्याच दिवसापासून केले जाईल, जेणे करून तो परिपूर्ण व्यवस्थेत पार पाडता येईल. त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्र्यंबकेश्वर येथे मांसविक्री बंद करण्याच्या मागणीबाबत सरकार आवश्यक ते प्रयत्न करून साधु-महंतांच्या भावनेचा आदर केला जाईल. त्याचबरोबर घाट विस्तारीकरणाबाबत शक्यतांची पडताळणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा ऐन पावसाळ्यात येत असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली असल्याचे सांगून, देशात सर्वात चांगला कुंभमेळा पार पाडण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. आगामी काळात आपण दर आठवड्याला त्र्यंबकेश्वरला भेट देणार असून, एप्रिल महिन्यापासून आठवड्यातून तीन दिवस व त्यानंतर सलग महिनाभर मुक्कामी थांबणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद महाराज, हरिगिरीजी महाराज, नरेंद्रगिरीजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रारंभी सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा गोषवारा प्रास्ताविकात मांडला. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, बाळासाहेब सानप, त्र्यंबकच्या नगराध्यक्ष अलका शिरसाठ, उपनगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी, मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदि उपस्थित होते. जोड