शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सटाणा शहरात १ मेपर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:13 IST

सटाणा : कोरोनाबाधितांसह सोबतच तरुणांची मृत्यूसंख्या सटाण्यात ओढावल्याने अखेर शुक्रवार दि. १६ पासून १ मे पर्यंत पंधरा दिवसांचा जनता ...

सटाणा : कोरोनाबाधितांसह सोबतच तरुणांची मृत्यूसंख्या सटाण्यात ओढावल्याने अखेर शुक्रवार दि. १६ पासून १ मे पर्यंत पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. त्याला पहिल्या दिवशी शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र पाटील, इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वा. येथील तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली.

सर्वपक्षीय बैठकीत माजी नगराध्यक्ष विजय वाघ, उपाध्यक्ष दीपक पाकळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, काकाजी सोनवणे, मनोहर सोनवणे, दत्तू बैताडे, राकेश खैरनार, राहुल सोनवणे, मनसेचे पंकज सोनवणे, मंगेश भामरे, जगदीश मुंडावरे,रत्नाकर सोनवणे, राजेंद्र राका, प्रदीप भांगडीया, विकास दशपुते, प्रदीप बच्छाव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

--------------

विनाकारण फिरणाऱ्यांना दणका

शहरात विनाकारण रस्त्यांवर हिंडणाऱ्या युवकांसह नागरिकांची पोलीस रॅपिड टेस्ट करणार असून त्यांची रवानगी कोविड सेंटर्स येथे करण्याचे निश्‍चित करण्यात आले. तसेच आस्थापना व दुकाने मागील दारातून सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली. शुक्रवार दि. १६ ते १ मे हा पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असला तरीही शहरातील किराणा व भाजीपाला सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सुरू ठेवण्यात आला आहे. मेडिकल दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असून उर्वरित सर्व व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.