शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भाजप पदाधिकाऱ्यांकडून निलंबनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

नाशिक : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरवर्तनाच्या आरोपावरून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आल्याच्या घटनेचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला ...

नाशिक : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरवर्तनाच्या आरोपावरून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आल्याच्या घटनेचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला असून, याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांवर एक वर्षासाठी कारवाई करण्यात आल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. दोन दिवसांचे अधिवेशन बोलविणे हीच मुळी लोकशाहीची थट्टा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील अनेक प्रश्न समेार असतानाही त्याबाबत सरकराकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. राज्यात मराठा, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा व मुलाखती यांसह अनेक प्रश्न समोर आहेत. मात्र, राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येत असल्याचा आरेाप करण्यात आला आहे.

या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्त्वाच्या विषयाची चर्चा होणार नाही. जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. विधिमंडळ सदस्यांना घटनेने दिलेले अधिकार म्हणजेच प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव देणे, लक्षवेधी सूचना मांडणे असे असतानाही त्यांना प्रश्न मांडू दिले नाही. त्यामुळे भाजपकडून सोमवारी लोकशाही वाचवा दिन पाळण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बारा आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन केल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक प्रशांत जाधव, विजय साने, हिमगौरी आडके, शिल्पा पारनेरकार, पूर्वा सावजी, आदी उपस्थित होते.