शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीतील सर्वच ४१ कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST

महापालिकेला लागू असलेली जकात २०१२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू करण्यात आला होता. त्यानंतर ...

महापालिकेला लागू असलेली जकात २०१२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ पासून एक राष्ट्र एक कर अशा जीएसटीला सुरुवात झाली. परंतु त्या आधी असलेल्या एलबीटीच्या सुमारे ६५ हजार प्रकरणांचा निपटारा सद्या सुरू आहेत, त्यात उद्योजक आणि व्यावसायिकांनी स्वत: मूल्यांकन करून रक्कम भरल्यानंतरही त्याचे महापालिकेकडून मूल्यांकन करणे बाकी होते. अशा ६५ हजार प्रकरणात मूल्यांकन सुरू आहेत. मात्र असे मूल्यांकन करतानाच तडजोडीसाठी ज्यादा रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी केल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. नगरसेवकांकडे उद्योजकांनी तक्रारी केल्याचे देखील सांगितले आहे. या प्रकरणात गैरव्यवहार होत असल्याच्या काही उद्योजकांच्या तक्रारीमुळे लगेचच काही नगरसेवक तक्रारीसाठी सरसावले. विरोधी पक्षनेते अजय बाेरस्ते या प्रकरणी कारवाईची मागणी केलीच. परंतु सत्तारूढ भाजपने हे प्रकरण आणखीनच गांभिर्याने घेत येत्या महासभेवर यासंदर्भात चाैकशीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. सभागृह नेते सतीश साेनवणे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर एलबीटी विभागात प्रचंड अस्वस्थता असून कर संकलन उपआयुक्त प्रदीप चौधरी यांनी सर्वच म्हणजे ४१ कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

इन्फो...

६५ हजार प्रकरणांची छाननी

करदात्या व्यावसायिकाने स्वमूल्यमापान करून एलबीटी भरल्यानंतर देखील त्यात आवश्यक तो कर जमा झाला नसेल तर महापालिका त्याची छाननी करून भरपाई करण्यास भाग पाडते. त्यामुळे कर संपला तरी आवश्यक ती रक्कम भरावीच लागते हा वादाचा मुद्दा आहे.

प्रोसेस इंडस्ट्रीजविषयी सर्वाधिक वादाचा मुद्दा आहे. एखाद्या उत्पादनावर प्रक्रिया केली तरी त्यापासून नवीन उत्पादन तयार होते असा दावा करीत महापालिकेकडून त्यावर सव्वा टक्के सवलत दराऐवजी नियमित एलबीटी आकारणी केल्यास सांगितले जाते, असा आरोप आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर भरताना त्यातील देय करापेक्षा कमी रक्कम असेल तर त्यासंदर्भात पूर्वी विशेषाधिकार अतिरिक्त आयुक्त आणि उपआयुक्तांनाच हेाते, त्यात खूप वेळ जात असल्याने हे अधिकार सहायक अधीक्षकांना देण्यात आले. त्यानंतर आता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते.