शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळाले दाखले

By admin | Updated: August 9, 2015 00:04 IST

कश्यपी धरण : पुनर्वसनासाठी प्रयत्नांना गती

नाशिक : नाशिककरांची वाढीव तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना देण्यात आलेला प्रकल्पग्रस्ताचा दाखला अखेर त्यांच्या वारसांच्या नावावर करण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी देवरगाव येथे जाऊन दाखल्यांचे वाटप करतानाच पुनर्वसनाच्या अंगाने सुविधांची पाहणीही केली. कश्यपी धरणासाठी नाशिक तालुक्यातील देवरगाव, गोळशी, गोंडेगाव, खऱ्याची वाडी या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमिनींच्या मालकांना शासनाचा मोबदला देतानाच, प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही त्यावेळी देण्यात आला; परंतु या दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणाचा फारसा लाभ प्रकल्पग्रस्तांना होऊ शकला नाही. साधारणत: ४५ वयोगटापर्यंत हा दाखला वैध ठरत असल्याने जमीनमालकांनी सदरचा दाखला वारसांना हस्तांतरित करावा, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले. या गोष्टींची दखल घेत जिल्हा पुनवर्सन अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड यांनी अशा प्रकल्पग्रस्तांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवून त्यावर कार्यवाही सुरू केली. मंगळवारी देवरगाव येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात येऊन त्यात काही प्रकल्पग्रस्तांना दाखले वितरित करण्यात आले. देवरगाव येथेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याने त्याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार आवारे, मंडल अधिकारी, तलाठी आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)