शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळाले दाखले

By admin | Updated: August 9, 2015 00:04 IST

कश्यपी धरण : पुनर्वसनासाठी प्रयत्नांना गती

नाशिक : नाशिककरांची वाढीव तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना देण्यात आलेला प्रकल्पग्रस्ताचा दाखला अखेर त्यांच्या वारसांच्या नावावर करण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी देवरगाव येथे जाऊन दाखल्यांचे वाटप करतानाच पुनर्वसनाच्या अंगाने सुविधांची पाहणीही केली. कश्यपी धरणासाठी नाशिक तालुक्यातील देवरगाव, गोळशी, गोंडेगाव, खऱ्याची वाडी या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमिनींच्या मालकांना शासनाचा मोबदला देतानाच, प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही त्यावेळी देण्यात आला; परंतु या दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणाचा फारसा लाभ प्रकल्पग्रस्तांना होऊ शकला नाही. साधारणत: ४५ वयोगटापर्यंत हा दाखला वैध ठरत असल्याने जमीनमालकांनी सदरचा दाखला वारसांना हस्तांतरित करावा, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले. या गोष्टींची दखल घेत जिल्हा पुनवर्सन अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड यांनी अशा प्रकल्पग्रस्तांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवून त्यावर कार्यवाही सुरू केली. मंगळवारी देवरगाव येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात येऊन त्यात काही प्रकल्पग्रस्तांना दाखले वितरित करण्यात आले. देवरगाव येथेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याने त्याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार आवारे, मंडल अधिकारी, तलाठी आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)