शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

जिल्ह्यात शुद्ध पाण्यासाठी कृती आराखड्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST

केंद्र सरकारच्या जल मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत नळजोडणीद्वारे शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे ...

केंद्र सरकारच्या जल मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत नळजोडणीद्वारे शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी गाव कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून गाव कृती आराखडा तयार करणे आवश्यक असून, गावातील सर्व घटकांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत तयार करावयाच्या गाव कृती आराखडा पंधरवडा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने सरपंच, ग्रामसेवक, जल सुरक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्राम पाणीपुरवठा समितीचे दोन सदस्य यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व १५ तालुक्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार असून, गाव कृती आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. गुरुवारी (दि. २९) रोजी दिंडोरी, इगतपुरी, कळवण, बागलाण, सुरगाणा, पेठ व कळवण या तालुक्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

गाव कृती आराखडा लोकसहभागातून तयार केल्यानंतर व त्याला १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजुरी घेतल्यानंतरच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना व त्याबाबतच्या अंदाजपत्रक याना मंजुरी दिली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली. या प्रशिक्षणात गाव कृती आराखडा महत्त्व व तांत्रिक मार्गदर्शन, निर्मिती प्रक्रिया, पाणी गुणवत्ताविषयक माहिती व नोंदणी, योजना फेरी व प्रश्नावली तसेच सामाजिक अणि संसाधन नकाशे तयार करणे आदी माहिती दिली जात आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे, अभियंता अमोल घुगे, विनोद देसले, संतोष धस, भाग्यश्री बैरागी, सुरेश जाधव, रवींद्र बराथे आदी उपस्थित होते.