शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

द्राक्षबागा तोडून डांगर लागवडीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

द्राक्ष शेती ही संपूर्णपणे हवामान बदलावर अवलंबून असल्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना दिसत आहेत. हवामान बदलाचा ...

द्राक्ष शेती ही संपूर्णपणे हवामान बदलावर अवलंबून असल्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना दिसत आहेत. हवामान बदलाचा विचार करून दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील प्रयोगशील शेतकरी विलास दादाजी जाधव यांनी आपल्या दोन एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आणि डांगर लागवड करत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले.

जाधव यांनी द्राक्षबाग तोडल्यानंतर शेताची कोणतीही मशागत न करता तोडलेल्या द्राक्षवेलीची खुटके ट्रॅक्टरने काढून घेतले. त्याच द्राक्षवेलीच्या ठिकाणी डांगराचे बी टोभण्यात आले. बागेला ठिबक सिंचन असल्यामुळे तो खर्च करण्याची वेळ आली नाही. साधारणपणे दोन एकरांत दोन हजार डांगर बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करण्यात आली. दोन सरींमधील अंतर ९ बाय ६ असल्यामुळे डांगर वेल जमिनीवर पसरण्यास कुठलीही गर्दी झाली नाही. त्यामुळे वेलीची वाढ अतिशय चांगली झाली. त्यात द्राक्षबागेला प्रत्येकवर्षी टाकलेले शेणखत, जैविकखत व रासायनिक खत यांचा डांगरवेलीला मोठा फायदा झाला. ८० दिवसांमध्ये डांगर काढण्यास तयार होऊन एका वेलीवर ७० ते ८० किलो माल मिळाला. सध्या सर्व डांगराची तोडणी झाली असून, ३५ ते ४० टन मालाची नाशिक मार्केटमध्ये हातविक्री होत आहे. डांगराला आठ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. डांगर तोडणीनंतर दोन ते तीन महिने साठवून ठेवता येते. त्यामुळे बाजारभावानुसार मालाची विक्री करता येते. अतिशय कमी खर्चात विलास जाधव यांनी हे पीक घेतले आहे. ५ हजार २०० रुपयांच्या भांडवलामध्ये त्यांनी साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोट....

सध्याच्या परिस्थितीमध्ये हमीभाव नसल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यासाठी शेतकरी वर्गाने कमी खर्चात जास्ती जास्त उत्पादन काढता येईल, अशा पिकांची लागवड करणे आवश्यक असून, काळाची पावले व हवामान बदलावर आधारित पिके काढण्याची तसेच अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- विलास जाधव, शेतकरी, करंजवण

फोटो- १७ दिंडोरी फार्मर

===Photopath===

170621\17nsk_32_17062021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ दिंडोरी फार्मर