शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शहर बससेवेला प्राधान्य : आवश्यकतेनुसार नोकरभरती; ई-गर्व्हनन्सवर भर मुंढे राबविणार मुख्यमंत्र्यांचा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:28 IST

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देआवश्यकतेनुसार नोकरभरती निर्देशानुसारच आपला कारभार

नाशिक : महापालिकेत नाशिककरांनी स्पष्ट बहुमत देऊनही वर्षभरात सत्ताधारी भाजपाला विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आलेले अपयश आणि अंतर्गत कलह लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांच्याकडे नाशिक महापालिकेची धुरा सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि.९) मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आपला कारभार चालणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, शहर बससेवा ताब्यात घेण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार असून, ई-गर्व्हनन्सवर भर देत आवश्यकतेनुसार नोकरभरती केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंढे यांनी आपली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनेच झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती देणे आणि माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची उभारणी करणे आदी बाबींवर आपला भर राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मुंढे म्हणाले, शहर बससेवा महापालिकेनेच चालवायची आहे. त्याबाबतचा अहवाल क्रिसिलने महापालिकेला दिलेला आहे. फक्त मॉडेल कोणते वापरायचे यावर निर्णय बाकी आहे. शहराला सार्वजनिक वाहतुकीची जास्त आवश्यकता आहे. भविष्यात शहराचे पर्यावरणीयदृष्ट्या संतुलन बिघडायचे नसेल तर खासगी वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा लागणार आहे. महापालिकेत यापुढे कोणताही प्रकल्प राबविताना त्याची खरोखरच आवश्यकता आहे काय, हे तपासले जाईल. कामांच्या निविदा या प्रचलित डीएसआर रेटच्यावर जाणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल. गुणवत्तेशी अजिबात तडजोड केली जाणार नाही. शहरात वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पार्किंग पॉलिसी तयार करण्यात येईल. आॅफ रोड पार्किंगवर जास्त भर दिला जाईल. शहरातील स्वच्छताही महत्त्वाची आहे. सफाई कामगारांनी वेळेवर नियमित सफाई केली पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: शहरात फिरणार असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. महापालिकेत अपुºया मनुष्यबळाची जाणीव आहे. शासनाकडे महापालिकेने आकृतिबंध पाठविला आहे. तो शासनाकडून मंजूर करून आणून आवश्यकतेनुसार कुशल कर्मचाºयांची भरती केली जाईल. प्रशासकीय कामकाजात आयटीचा वापर अधिक वाढविण्यात येईल. स्मार्ट सिटी अंतर्गत होणाºया प्रकल्पांना गती दिली जाणार असून, महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांच्यात उत्तम समन्वय राखला जाईल, अशी ग्वाहीही मुंढे यांनी दिली.