शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कलचाचणी बंधनकारक

By admin | Updated: February 4, 2017 22:51 IST

१५ पासून अंमलबजावणी : विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडे द्यावी लागणार

नाशिक : माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरून ‘कलचाचणी’ करणे बंधनकारक असल्याने शाळांनी येत्या १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन याबाबतचा अहवाल विभागीय मंडळाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.  शैक्षणिक आयुष्यात दहावीला विशेष महत्त्व असल्याने दहावीतच विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक कल लक्षात घेण्यासाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते. यावर्षी दहावीत प्रविष्ट असलेल्या नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी, मार्च २०१७ मध्ये प्रथम प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर कलचाचणी बंधनकारक आहे. सदर चाचणी ही शाळास्तरावरच होणार असल्याने संबंधित शाळांनी आपल्या शाळेमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील संपूर्ण संगणक यंत्रणा तयार करावी, असे परीक्षा मंडळाने कळविले आहे.  शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध संगणक यांचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात यावी, यासाठी एका शिक्षकाची नेमणूक करून त्याबाबतची माहिती मंडळास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमित विद्यार्थ्यास सदर कलचाचणी अनिवार्य असल्याने कलचाचणीस उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. सदर सर्व उपस्थिती पत्रके प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबर विभागीय मंडळात जमा करणे बंधनकारक आहे.