शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

स्वामी समर्थनगर भागात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST

खंडित वीज पुरवठ्याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून वरचेवर काम केले जात असल्याने सातत्याने वीज ...

खंडित वीज पुरवठ्याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून वरचेवर काम केले जात असल्याने सातत्याने वीज खंडित होत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हॉटेल जत्रा मागे स्वामी समर्थ नगर, इच्छामणी नगर परिसरात साधारण चार ते पाच हजार नागरिकांची वसाहत आहे. येथील नागरिकांना काही महिन्यापासून विजेच्या वारंवार होणाऱ्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर वादळी वारा यामुळे बिजली गुल होण्याचे प्रमाण कायम असते. मात्र इतरवेळी देखील वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित नागरिक इंजिनियर अथवा वायरमन यांना फोन करतात. मात्र बहुतांश वेळा संबंधित अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाही. वीज पुरवठा खंडित का होतो याबाबत मात्र समाधानकारक उत्तर स्थानिक लोकांना मिळत नाही. त्यातच कोरोनाचे काही रुग्ण देखील या भागात असून काही क्वारंटाईन आहेत. काहींना घरीच ऑक्सिजन लावलेले असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून लवकरात लवकर या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.