शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद

By admin | Updated: August 15, 2014 00:35 IST

‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद

 

नाशिक : रासलीलामधील पाच अध्याय हे भागवताचे पंचप्राण आहेत. रासलीलेत स्त्री आणि पुरुष यांच्या मीलनाची कथा नव्हे, तर जीव आणि ब्रह्म यांच्या मीलनाचे वर्णन आहे. रासपंचाध्यायात जिवाला जगदीश बनविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन भागवत कथाकार किरीटभाई यांनी ‘गोपी गीत’ प्रवचनमालेत बोलताना केले.गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात नासिक सेवा समिती ट्रस्टच्या वतीने ‘गोपी गीत’ या प्रवचनमालेस आजपासून प्रारंभ झाला. यावेळी किरीटभाई यांनी सांगितले, रासपंचाध्याय माणसाला आसक्ती, मोह यांपासून दूर नेते. ईश्वराचे प्रेम हे अपौरषिय, अलौकिक आहे. ते समजण्यासाठी ईश्वरच तुमच्या शरीरात उतरला पाहिजे. मात्र जेवढी दुनिया तेवढेच आम्हाला ज्ञान असते. जे पाहिले, जे खाल्ले या पलीकडे आपल्याला ज्ञान नसते. भक्ताला ईश्वराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. त्याच्यातील दोष लक्षात येत नाही. कन्हय्याची नजरही घायाळ करते. ज्याच्या मनात चैन नाही, परंतु प्रेम आहे तो गोपी. जो खरे प्रेम करतो त्याला विरहातही दु:ख होते; परंतु जेथे विरहातही दु:ख होत नाही तेथे व्यवहार येतो. रासलीला ही कामविरामलीला असल्याचेही किरीटभाई यांनी सांगितले. प्रारंभी ट्रस्टचे पदाधिकारी ब्रिजलाल धूत, नेमीचंद पोद्दार, राजेश पारीक, जगदीश काबरा, प्रदीप बूब, संजय सोनी, बिमल सराफ आदिंचा सत्कार करण्यात आला. दि. १५ आॅगस्टपर्यंत रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. (प्रतिनिधी)