शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद

By admin | Updated: August 15, 2014 00:35 IST

‘रासलीला’मध्ये जिवाला जगदीश बनविण्याची ताकद

 

नाशिक : रासलीलामधील पाच अध्याय हे भागवताचे पंचप्राण आहेत. रासलीलेत स्त्री आणि पुरुष यांच्या मीलनाची कथा नव्हे, तर जीव आणि ब्रह्म यांच्या मीलनाचे वर्णन आहे. रासपंचाध्यायात जिवाला जगदीश बनविण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन भागवत कथाकार किरीटभाई यांनी ‘गोपी गीत’ प्रवचनमालेत बोलताना केले.गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात नासिक सेवा समिती ट्रस्टच्या वतीने ‘गोपी गीत’ या प्रवचनमालेस आजपासून प्रारंभ झाला. यावेळी किरीटभाई यांनी सांगितले, रासपंचाध्याय माणसाला आसक्ती, मोह यांपासून दूर नेते. ईश्वराचे प्रेम हे अपौरषिय, अलौकिक आहे. ते समजण्यासाठी ईश्वरच तुमच्या शरीरात उतरला पाहिजे. मात्र जेवढी दुनिया तेवढेच आम्हाला ज्ञान असते. जे पाहिले, जे खाल्ले या पलीकडे आपल्याला ज्ञान नसते. भक्ताला ईश्वराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. त्याच्यातील दोष लक्षात येत नाही. कन्हय्याची नजरही घायाळ करते. ज्याच्या मनात चैन नाही, परंतु प्रेम आहे तो गोपी. जो खरे प्रेम करतो त्याला विरहातही दु:ख होते; परंतु जेथे विरहातही दु:ख होत नाही तेथे व्यवहार येतो. रासलीला ही कामविरामलीला असल्याचेही किरीटभाई यांनी सांगितले. प्रारंभी ट्रस्टचे पदाधिकारी ब्रिजलाल धूत, नेमीचंद पोद्दार, राजेश पारीक, जगदीश काबरा, प्रदीप बूब, संजय सोनी, बिमल सराफ आदिंचा सत्कार करण्यात आला. दि. १५ आॅगस्टपर्यंत रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. (प्रतिनिधी)