शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

अभोणेकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे

By admin | Updated: July 14, 2016 00:43 IST

प्रवासी वर्गात संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त

  संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्तकळवण : पावसाळा येताच रस्त्यांवरील खड्डे उघडे पडणे व ते वाढत जाणे ही समस्या नवीन नाही. हाच कित्ता यावर्षीही पहावयास मिळत असल्याने अभोणेकरांना त्याचे नवल वाटत नाही. अभोणा चौफुली परिसरातील रस्त्यावरील मोठंमोठे खड्डे आता अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा लक्षात येत नसल्याने धोका वाढला आहे. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या, खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे. पण ते नियमितपणे इमाने इतबारे केले जात नाही, अशी अभोणेकरांची तक्रार आहे. परिणामी दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे. यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरु स्ती झालेली नाही. रस्तादुरुस्ती न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्यास दररोज वाढत चालला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने ते वाहनचालकांना दिसून येत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता बळावली आहे. या रस्त्यावरून रोज शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात; पण सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे केव्हा बुजवतील , असा सवाल या मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना पडला आहे.निवेदन देऊन ही परिस्थिती ‘जैसे थे’. गेल्या महिन्यात येथील साई समर्थ ग्रुपच्या युवकांनी अभोणा चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन दिले होते. त्यावेळेस खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा देण्यात आला. परंतु आज रोजी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने संबंधित विभागाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रस्त्यावर झाडे लावून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा साई समर्थ ग्रुपच्या चेतन दिवाण, रोशन वाघ, कुणाल सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश सूर्यवंशी आदि कार्यकत्यांनी दिला आहे. (वार्ताहर)