शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अभोणेकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे

By admin | Updated: July 14, 2016 00:43 IST

प्रवासी वर्गात संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त

  संताप : डागडुजी केवळ नावापुरतीच, सततच्या अपघातांमुळे नागरिक त्रस्तकळवण : पावसाळा येताच रस्त्यांवरील खड्डे उघडे पडणे व ते वाढत जाणे ही समस्या नवीन नाही. हाच कित्ता यावर्षीही पहावयास मिळत असल्याने अभोणेकरांना त्याचे नवल वाटत नाही. अभोणा चौफुली परिसरातील रस्त्यावरील मोठंमोठे खड्डे आता अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने भरलेला खड्डा लक्षात येत नसल्याने धोका वाढला आहे. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या, खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे. पण ते नियमितपणे इमाने इतबारे केले जात नाही, अशी अभोणेकरांची तक्रार आहे. परिणामी दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे. यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरु स्ती झालेली नाही. रस्तादुरुस्ती न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्यास दररोज वाढत चालला आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहात असल्याने ते वाहनचालकांना दिसून येत नाही. परिणामी अपघाताची दाट शक्यता बळावली आहे. या रस्त्यावरून रोज शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात; पण सार्वजनिक बांधकाम विभाग हे खड्डे केव्हा बुजवतील , असा सवाल या मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना पडला आहे.निवेदन देऊन ही परिस्थिती ‘जैसे थे’. गेल्या महिन्यात येथील साई समर्थ ग्रुपच्या युवकांनी अभोणा चौफुलीवरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन दिले होते. त्यावेळेस खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा देण्यात आला. परंतु आज रोजी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने संबंधित विभागाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रस्त्यावर झाडे लावून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा साई समर्थ ग्रुपच्या चेतन दिवाण, रोशन वाघ, कुणाल सोनवणे, दिलीप सोनवणे, गणेश सूर्यवंशी आदि कार्यकत्यांनी दिला आहे. (वार्ताहर)