वेतनवाढ करार : ४५ टक्के पगारवाढीची कृती समितीची मागणीनाशिक : वीज कंपनीत काम करणार्या कर्मचार्यांचा वेतनवाढ करार मागील वर्षी १ एप्रिल रोजीच संपुष्टात आलेला आहे. नवीन करारवाढीसाठी कर्मचार्यांचा संघर्ष सुरू असून, कंपनीच्या वित्त अधिकार्यांनी काही मागण्यांवर संमती दर्शविल्याने कर्मचार्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत वेतनवाढीची औपचारिक घोषणा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत संघटना आणि व्यवस्थापनाच्या आत्तापर्यंत चार बैठका झालेल्या आहेत. या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा निघालेला असल्याचा दावा संघटनेने केला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या १६ मेनंतर कधीही होऊ शकतो. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत वित्त विभागाचे संचालक डी. डी. वाव्हळ यांनी मेडिक्लेम, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर आदि विषयांवर अनुकूलता दर्शविली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी कळविले आहे. तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतनश्रेणी मिळावी, तांत्रिक कामगारांच्या भत्त्यात वाढ करण्यात यावी, तांत्रिक कामगारांच्या अपग्रेडचा प्रस्ताव तीनही कंपन्यांत एकसूत्री असावा यासाठी आढावा घेऊन निर्णय घेण्याचा मानस व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. पगारवाढीच्या बैठकीत कशा प्रकारे वेतनवाढ द्यावी, त्यासाठी लागणारी रक्कम, टक्केवारी याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, तांत्रिक संघटनेने १ एप्रिल २०१३ च्या मूळ वेतनात ५० टक्के वाढीचा प्रस्ताव सादर केला; परंतु आठ संघटनांच्या कृती समितीत निर्णय घेऊन सर्वानुमते ४५ टक्के पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. त्यावर या बैठकीत निर्णय होईल. पगारवाढीसाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी सांगितले.
वीज कर्मचार्यांच्या पगारवाढीची शक्यता
By admin | Updated: May 16, 2014 00:33 IST