शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

कांदे नव्हे, बटाटे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या ...

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत आहेत . सद्या केवळ बटाटे ५० रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे बटाट्याचे महत्त्व वाढले आहे. कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे कांद्यापेक्षा बटाटे अनेक वर्षांनंतर महाग झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नव्हते. त्यांनीसुद्धा भाजीपाला लागवड केली, त्यामुळे पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फटका आज नगदी पिकाला बसत आहे.

पालेभाज्या कोणत्याही घेतल्यातरी अवघ्या पाच रुपये दरात इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक ५ रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. ही दोन्ही पिके सध्या दुसऱ्या राज्यातून येत आहे. येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसऱ्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल बेभावात विक्री करावा लागत आहे.

कोट...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारातदेखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्चदेखील वसूल होत नाही.

- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव