शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विभागात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST

नाशिक : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नाशिक विभागात १ लाख १३ हजार ३२० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता असून, महाबिज ...

नाशिक : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी नाशिक विभागात १ लाख १३ हजार ३२० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता असून, महाबिज आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाण्याची संख्या पाहता, यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाण्याचा अंदाज धरुन नियोजन केले आहे. विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत एकूण १ लाख ५१ हजार ९२ हेक्टर क्षेत्र सोयाबीनसाठी प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी १ लाख १३ हजार ३२० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाने जिल्हानिहाय बियाण्याचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांकडे असलेल्या बियाण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. विभागाला महाबिज आणि एनएससीकडून केवळ १७ हजार ५५२ क्विंटल इतकेच बियाणे उपलब्ध होणार आहे तर खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून १८ हजार ७७१ क्विंटल इतके बियाणे उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. उर्वरित सर्व बियाणे शेतकऱ्यांकडून उपलब्ध होण्याचे कृषी विभागाने गृहित धरले आहे. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेले नाही, ज्यांचेे उगवले त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी आल्याने यावर्षी देशात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसात सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे किती बियाणे उपलब्ध होईल, याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी कृषी वभागाने शेतकऱ्यांकडून एक लाख चार हजार ८९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल, असे गृहित धरले आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडील बियाण्याची उगवण क्षमता आणि त्याची निगा याबाबतही प्रश्न निर्माण होत असल्याने यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘महाबिज’कडून नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक १२,५०० क्विंटल तर धुळे जिल्ह्याला सर्वात कमी ४४१ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.

चौकट-

जिल्हानिहाय प्रस्तावित क्षेत्र आणि आवश्यक बियाणे

जिल्हा क्षेत्र (हे) बियाणे (क्विंटल)

नाशिक ८८२१४ ६६१६०

धुळे १४२०० १०६५०

नंदुरबार १८६७८ १४०१०

जळगाव ३०००० २२५००