शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

रेंजसाठी अंगणवाडी सेविकांना पोर्टेबिलिटीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची ...

गावपातळीवर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्वी संपूर्ण गावाच्याच आरोग्याची काळजी वाहावी लागत असे. त्यासाठी अकरा प्रकारचे रजिस्टर अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यात गावातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती, कुटुंबातील सदस्य, घरातील लहान मुले, किशोरवयीन मुले, मुली, गरोदर माता, स्तनदा मातांची माहिती यामध्ये दर दिवशी भरण्याचे अवघड काम केले जात होते. त्यापासून सुटका म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना अ‍ॅण्ड्राॅईड मोबाइल दिले. या मोबाइलमध्ये ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सिस्टम’ नावाचे अ‍ॅप असून, या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात प्रारंभी मोबाइलच्या रेंजचा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु गावोगावी कंपन्यांनी मोबाइल टॉवर उभारल्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटला असला तरीदेखील येणाऱ्या अडचणी पाहता, मोबाइलची पोर्टेबिलिटी करून त्यांनी त्यावर उतारा शोधला आहे.

--------

खंडित वीज पुरवठ्याचा त्रास

मोबाइलवरच अंगणवाडी सेविकांचे ऑनलाइन काम केले जात असले तरी, बऱ्याच वेळा गावातील खंडित वीज पुरवठ्याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. वीज पुरवठा नसल्यास मोबाइल टॉवर बंद पडतो, तसेच मोबाइल चार्जिंग करणेही अवघड होऊन बसते.

-------

कामकाजात सुसूत्रता

एकात्मिक बाल विकास विभागाने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे कामकाजात गतिमानता तसेच सुसूत्रता व अचूकता आली आहे. थेट राज्यापर्यंत गावाची माहिती पोहोचू लागली आहे.

-दीपक चाटे, महिला बाल कल्याण अधिकारी

-------------------------------

अकरा प्रकारची कामे करावी लागतात

* गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवणे

* गावातील शून्य ते दोन व दोन ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे, या बालकांचे दरमहा वजन घेणे, कुपोषित मध्यम, तीव्र गटात त्यांचे वर्गीकरण करणे.

* गावातील गरोदर महिलांची माहिती संकलित करून त्यांना तिसऱ्या महिन्यांपासूनच देखरेखीखाली ठेवणे, स्तनदा महिलांना पोषण आहार देणे.

* कुपोषित बालकांना पोषण आहार पुरविणे, त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे.

* पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, लाभार्थी निश्चित करणे व आहार वाटपावर नियंत्रण ठेवणे.