शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

पाच वर्षांत लोकसंख्या ९८ लाख

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

आरोग्याधिकाऱ्याचे अजब तर्कट : घंटागाडीचा सदोष प्रस्ताव

 नाशिक : सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या १४ लाख ८५ हजार इतकी नोंदविली गेली आहे आणि आजच्या घडीला शहराची लोकसंख्या अंदाजे १८ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्येचा दर लक्षात घेता पाच वर्षांत फार, तर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखावर जाऊ शकेल परंतु महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार करताना शहराची लोकसंख्या पाच वर्षांत तब्बल ९८ लाखांवर जाऊन पोहोचणार असल्याचे अजब तर्कट मांडले असून त्याच आधारे कचरा संकलनाची आकडेवारी काढत घंटागाडीचा सदोष प्रस्ताव तयार केला आहे. आता असे तर्कट मांडण्यात आरोग्याधिकाऱ्याचे गणित कच्चे आहे की त्यापाठीमागे वेगळेच ‘गणित’ आहे याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १७६ कोटी रुपयांचा घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर घंटागाडी ठेक्याच्या मूळ प्रस्तावात आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्राप्त निविदादरानुसार ५ वर्षांकरिता अपेक्षित खर्च ढोबळपणे मांडला आहे. त्यात सहाही विभागातील लोकसंख्या गृहित धरून पाच वर्षांत किती टन कचरा संकलन होऊ शकेल याचीही अंदाजे आकडेवारी देण्यात आली आहे. परंतु अंदाज वर्तवतानाही त्यात वास्तवाला स्पर्श न करण्याचा पराक्रम आरोग्याधिकाऱ्याने केला आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्तावात पाच वर्षांनंतर नाशिक पूर्व विभागाची लोकसंख्या १६ लाख ६९ हजार ७३०, पश्चिम विभागाची १३ लाख ४५ हजार ३५८, पंचवटी विभागाची १९ लाख २४ हजार २६५, नाशिकरोड विभागाची १८ लाख २५ हजार ६६५, सिडको विभागाची १७ लाख ३२ हजार ३७५ आणि सातपूर विभागाची १३ लाख ६४ हजार १५ याप्रमाणे लोकसंख्या होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे, तर सहाही विभागांत सर्वसाधारणपणे पाच वर्षांत घनकचरा सुमारे ११ लाख टन इतका संकलित होणार असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारीवरूनच दराची निश्चिती करण्यात आलेली आहे. पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख ६१ हजार होण्याचा अंदाज आरोग्याधिकाऱ्याने वर्तविल्याने नाशिककरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येऊन ठेपेल. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करताना आजच्या लोकसंख्येला पाचने गुणले आणि लोकसंख्या ९८ लाखांवर नेऊन पोहोचविली. त्यामुळे संपूर्ण प्रस्तावच सदोष झाला. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने लोकसंख्या वाढीचे अजब तर्कट मांडत शासनाच्या आरोग्यविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन संकल्पनेचा ‘कचरा’केल्याची रंजक चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.