शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पाच वर्षांत लोकसंख्या ९८ लाख

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

आरोग्याधिकाऱ्याचे अजब तर्कट : घंटागाडीचा सदोष प्रस्ताव

 नाशिक : सन २०११ च्या जनगणनेनुसार नाशिकची लोकसंख्या १४ लाख ८५ हजार इतकी नोंदविली गेली आहे आणि आजच्या घडीला शहराची लोकसंख्या अंदाजे १८ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्येचा दर लक्षात घेता पाच वर्षांत फार, तर शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखावर जाऊ शकेल परंतु महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार करताना शहराची लोकसंख्या पाच वर्षांत तब्बल ९८ लाखांवर जाऊन पोहोचणार असल्याचे अजब तर्कट मांडले असून त्याच आधारे कचरा संकलनाची आकडेवारी काढत घंटागाडीचा सदोष प्रस्ताव तयार केला आहे. आता असे तर्कट मांडण्यात आरोग्याधिकाऱ्याचे गणित कच्चे आहे की त्यापाठीमागे वेगळेच ‘गणित’ आहे याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १७६ कोटी रुपयांचा घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर घंटागाडी ठेक्याच्या मूळ प्रस्तावात आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी प्राप्त निविदादरानुसार ५ वर्षांकरिता अपेक्षित खर्च ढोबळपणे मांडला आहे. त्यात सहाही विभागातील लोकसंख्या गृहित धरून पाच वर्षांत किती टन कचरा संकलन होऊ शकेल याचीही अंदाजे आकडेवारी देण्यात आली आहे. परंतु अंदाज वर्तवतानाही त्यात वास्तवाला स्पर्श न करण्याचा पराक्रम आरोग्याधिकाऱ्याने केला आहे. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्तावात पाच वर्षांनंतर नाशिक पूर्व विभागाची लोकसंख्या १६ लाख ६९ हजार ७३०, पश्चिम विभागाची १३ लाख ४५ हजार ३५८, पंचवटी विभागाची १९ लाख २४ हजार २६५, नाशिकरोड विभागाची १८ लाख २५ हजार ६६५, सिडको विभागाची १७ लाख ३२ हजार ३७५ आणि सातपूर विभागाची १३ लाख ६४ हजार १५ याप्रमाणे लोकसंख्या होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे, तर सहाही विभागांत सर्वसाधारणपणे पाच वर्षांत घनकचरा सुमारे ११ लाख टन इतका संकलित होणार असल्याचे म्हटले आहे. या आकडेवारीवरूनच दराची निश्चिती करण्यात आलेली आहे. पाच वर्षांत शहराची लोकसंख्या ९८ लाख ६१ हजार होण्याचा अंदाज आरोग्याधिकाऱ्याने वर्तविल्याने नाशिककरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येऊन ठेपेल. आरोग्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करताना आजच्या लोकसंख्येला पाचने गुणले आणि लोकसंख्या ९८ लाखांवर नेऊन पोहोचविली. त्यामुळे संपूर्ण प्रस्तावच सदोष झाला. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्याने लोकसंख्या वाढीचे अजब तर्कट मांडत शासनाच्या आरोग्यविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन संकल्पनेचा ‘कचरा’केल्याची रंजक चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.