शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

भाजपाच्या लोकप्रियतेने शिवसेनेला पोटशूळ

By admin | Updated: February 18, 2017 00:16 IST

रावसाहेब दानवे : मखमलाबाद येथील सभेत टीका

नाशिक : लोकसभा, विधानसभा अन् त्यापाठोपाठ झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ पक्षाची जनमानसात वाढत चाललेली लोकप्रियता व विश्वास पाहून प्रदीर्घ काळापासूनचा मित्रपक्ष शिवसेनेच्या पोटात शूळ उठला आहे़ त्यामुळेच महापालिका निवडणुकीत त्यांनी युती तोडली असे सांगून प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली़ येत्या २३ तारखेला भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष म्हणून समोर येईल, असे भाकितही वर्तविले़  भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत दानवे बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर दौरे सुरू असून, यामध्ये भारतीय जनता पक्षावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले आहे़ गत लोकसभा, विधानसभा व त्यापाठोपाठ झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला़ यापूर्वी भाजपाचे केवळ २४० नगरसेवक व ८ नगराध्यक्ष होते, मात्र ही संख्या आता ८० नगराध्यक्ष व १२०७ नगरसेवक इतकी झाली आहे़ राज्यातील सर्व पक्ष हे भाजपाविरोधात एकवटले असून, एकमेकांच्या फलकांवर झळकत आहेत. आपणच तारणहार असल्याचे सांगत आहेत़ मात्र, पूर्वीची आणेवारीची, नुकसानभरपाईची पद्धत, पीकविमा पद्धती बदलण्यासाठी भाजपानेच तत्कालीन सरकारशी संघर्ष केला़ सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या व सोन्याच्या ताटात जेवण करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हाल कसे समजणार, असा सवाल करून भाजपा सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने सोशल मीडियावर भाजपाची बदनामी सुरू केली आहे़  केंद्रात तसेच राज्याच्या तिजोरीवर कमळाचे कुलूप असून, ते उघडण्यासाठी कमळाचीच चावीची आवश्यकता आहे. मतदार सुज्ञ असल्याचे दानवे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, रोहिणी नायडू आदिंसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)