शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

डाळिंबाला कवडीमोल भाव; बळीराजा हवालदिल

By admin | Updated: September 4, 2014 00:06 IST

डाळिंबाला कवडीमोल भाव; बळीराजा हवालदिल

विंचुरे : डाळिंबाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे बळिराजा संकटात सापडला आहे. मागील वर्षी ७०ते ८० रुपये किलो दर असलेल्या डाळिंबाला यंदा केवळ २० रुपये किलो इतका दर मिळत आहे. डाळींब हे कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाची लागवड केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन केलेल्या डाळिंबावर यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने अवकृपा केली. जानेवारीत बहार धरलेल्या डाळींब पिकावर फूल निघण्याच्या काळात आणि फळधारणेच्या वेळी म्हणजेच फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या. काही शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून बागा वाचवण्यात यश मिळवले. मात्र मे व जून महिन्यात तेल्या रोगाने पुन्हा डाळिंबावर झडप घातली. त्यामुळे शेकडा ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या. तेल्या रोगाने परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे हातात आलेले डाळिंबाचे फळे तोडून फेकून देण्यात आली आणि अशातच वाचलेल्या डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मात्र पूर्णपणे हवालदिल झाला आहे.व्यापारीवर्गाने शेतात येऊन डाळींब खरेदी केल्यास ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते कारण त्यामुळे त्यांचा वाहतूक, आडत, हमाली हा खर्च वाचतो. मात्र व्यापारी डाळींब खरेदीला येत नसल्यामुळे पक्का झालेला डाळींब मार्केटमध्ये नेऊन विकण्याशिवाय बळिराजाला पर्याय नाही. आज डाळिंबाला सरासरी २० रुपये किलो असा दर मिळत आहे. अशा दरामुळे शेतकऱ्यांचा डाळिंबाला झालेला खर्चसुद्धा निघेणासा झाला आहे. डाळींब पिकाला बहार धरल्याच्या दिवसापासून तर डाळींब निघेपर्यंत एकरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो आणि उत्पन्न एकरी पाच ते सहा टन येते. यावरून डाळिंबाचा होणारा खर्चसुद्धा निघत नसल्याचे चित्र स्पष्ट होते.परदेशात जर डाळींब विक्री चालू झाली तर भाव थोड्याफार प्रमाणात वाढतील, असे व्यापारीवर्गात बोलले जात आहे. म्हणून सध्यातरी निर्यात चालू होण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)