शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:17 IST

या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया ...

या निवडणुकीत ५५ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध निवडून आलेल्या असून, १,६२२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ४,२२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मतदान केंद्राचा ताबा घेतला असून, सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. अखेरच्या अर्ध्या तासात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांना सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत ६,११,६५४ स्त्री मतदार, तर ६,७२,४५३ पुरुष मतदार, असे एकूण १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी ३८९ अधिकारी, तर ९,७६० इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. महामंडळाच्या ६१ बसच्या माध्यमातून, तसेच ४०२ जीप आणि १२६ मिनी बसच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना करण्यात आले. मतदानासाठी २,५६० कंट्रोल युनिट, तर तितकेच बॅलेट, असे एकूण ५,१२० युनिटस्‌ १,९५२ मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. सायंकाळच्या सुमारास संवेदनशील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पोलिसांनी संचलन केले.