शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पोलीस तुपाशी, महसूल उपाशी !

By admin | Updated: March 24, 2017 00:09 IST

नाशिक : निवडणुकीची सारी प्रशासकीय जबाबदारी दीड महिने शिरावर घेणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने राज्यातील महसूल विभागात असंतोष खदखदू लागला आहे.

नाशिक : अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना निघून मतदान, मतमोजणी व अगदी विजयी मिरवणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल राज्य सरकारने निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे एक महिन्याचे वेतन मानधन म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून, दुसरीकडे याच निवडणुकीची सारी प्रशासकीय जबाबदारी दीड महिने शिरावर घेणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याने राज्यातील महसूल विभागात असंतोष खदखदू लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश काढून सुमारे तेरा कोटी रुपयांहून अधिक रकमेला मंजुरी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. २०१४ मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात आल्या. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस यंत्रणेने कामाचा ताण, कामाची व्याप्ती व कामाचे दिवसाचा विचार न करता परिश्रमपूर्वक व जबाबदारीने निवडणूक पार पाडल्याचे शासनाचे मत झाले व त्याचा मोबदला म्हणून ज्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक काळात काम केले अशा सर्वांना त्यांचे एक महिन्याचे वेतन निवडणूक मानधन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल पोलीस खात्यात उत्स्फूर्त स्वागत केले जात असले तरी, निवडणुकीची सारी प्रशासकीय व मुख्य जबाबदारी पार पाडणाऱ्या महसूल विभागावर मात्र अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून ते निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज करताना उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, छाननी, यादी तयार करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, त्याचे आराखडे, निवडणुकीसाठी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, साहित्याची जमवाजमव, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची तयारी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणे, यंत्रांची वाहतूक, मतमोजणी यांसारखी शेकडो कामे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलेली असताना त्यांना मात्र अद्यापही शासनाने मानधन दिले नसल्याची बाब असंतोषात भर घालणारी ठरली आहे. पोलीस यंत्रणेला एक महिन्याचे वेतन मानधनापोटी दिल्याचा शासनाचा आदेश जारी होताच, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप प्रगट करण्यास सुरुवात केली असून, बुधवारपासून शासन विरोधातील पोस्ट व्हायरल होत असून, त्यात आता यापुढे निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.