शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धबधबा क्षेत्रात पोलिसांचे निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या ...

घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये, धबधब्यांवर अजूनही पोलिसांचे निर्बंध कायम असून पर्यटकांनी पावसाळ्यात खबरदारी म्हणून पर्यटन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊननंतर दोन वर्षे घरातच बसून कंटाळा आलेल्या पर्यटकांना इगतपुरीचा परिसर पावसाळ्यात आवडीचे ठिकाण असल्याने धोके वाढले असल्याने सतर्क होण्याची गरज आहे. इगतपुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, ठाणे जिल्ह्यातील विहिगाव येथील अशोका फॉल्स, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, काळूस्ते धरण, भाम धरण, वैतरणा धरण, कसारा घाट अशा विविध ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो.

शनिवार, रविवार वीकएंडला ठाणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. प्रशासकीय पातळीवर या पर्यटनस्थळावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरी छुप्या मार्गाने पर्यटक जात असल्याने आणि पर्यटनस्थळावरील धबधबे, धरणस्थळावरील जमीन दलदलीची झाली असल्याने धोके वाढले आहेत.

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असून महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी तीन महिने पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने या ठिकाणचा परिसर मनमोहक झालेला असतो. हिरवा शालू पांघरलेला परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो, परंतु दोन वर्षांच्या कार्यकाळात या पर्यटनस्थळावर कुठल्याही पर्यटकांची वर्दळ नसल्याने या ठिकाणचे हिंस्र पशू, पक्षी, जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने ही सर्व ठिकाणे धोकादायक झाली आहेत. तलाव, धरणांच्या किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गत दोन वर्षांपासून धरणात गाळ साचलेला असल्याने कित्येक पर्यटकांना दोन महिन्यांपूर्वी जीव गमवावे लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस येणाऱ्या पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यामध्ये, जंगलात न उतरण्याचा सल्ला वनविभागाचे अधिकारी व गिर्यारोहकांनी दिला आहे.

---------------------

त्र्यंबकेश्वर परिसरात धोक्याच्या सूचना

त्र्यंबकेश्वर परिसरातील व तालुक्यातील दुगारवाडी, ब्रह्मगिरी, लेकुरवाळी, नेकलेस धबधबा, अंबोली घाटातील धबधबा, अंजनेरी येथील उलटे धबधबे, हरसुल परिसरात पाच धबधबे असून दोन्हीकडे जास्त पाऊस झाल्यास लहान-मोठे असंख्य धबधबे उद्भवतात. या धबधब्यांवर पावसाळ्यात एन्जाॅय म्हणून जाऊ नये. याबरोबरच गड, किल्ले आदी स्थळांना जाऊ नये. दुगारवाडी धबधब्याने आतापर्यंत १० ते १५ बळी घेतले आहेत. पोलीस व वनविभागाने तर फलक लावून धोक्याची सूचना दिली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण मनाई केली आहे. निषिद्ध क्षेत्र म्हणून ही पर्यटनस्थळे घोषित केली आहेत. शनिवार व रविवार संचारबंदी करण्यात आली आहे.