शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धबधबा क्षेत्रात पोलिसांचे निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या ...

घोटी : नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन ठिकाणे, गड, किल्ले, धरणाचा परिसर, गिर्यारोहकांसाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये, धबधब्यांवर अजूनही पोलिसांचे निर्बंध कायम असून पर्यटकांनी पावसाळ्यात खबरदारी म्हणून पर्यटन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊननंतर दोन वर्षे घरातच बसून कंटाळा आलेल्या पर्यटकांना इगतपुरीचा परिसर पावसाळ्यात आवडीचे ठिकाण असल्याने धोके वाढले असल्याने सतर्क होण्याची गरज आहे. इगतपुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, ठाणे जिल्ह्यातील विहिगाव येथील अशोका फॉल्स, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, काळूस्ते धरण, भाम धरण, वैतरणा धरण, कसारा घाट अशा विविध ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो.

शनिवार, रविवार वीकएंडला ठाणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. प्रशासकीय पातळीवर या पर्यटनस्थळावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरी छुप्या मार्गाने पर्यटक जात असल्याने आणि पर्यटनस्थळावरील धबधबे, धरणस्थळावरील जमीन दलदलीची झाली असल्याने धोके वाढले आहेत.

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असून महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी तीन महिने पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने या ठिकाणचा परिसर मनमोहक झालेला असतो. हिरवा शालू पांघरलेला परिसर पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो, परंतु दोन वर्षांच्या कार्यकाळात या पर्यटनस्थळावर कुठल्याही पर्यटकांची वर्दळ नसल्याने या ठिकाणचे हिंस्र पशू, पक्षी, जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने ही सर्व ठिकाणे धोकादायक झाली आहेत. तलाव, धरणांच्या किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गत दोन वर्षांपासून धरणात गाळ साचलेला असल्याने कित्येक पर्यटकांना दोन महिन्यांपूर्वी जीव गमवावे लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस येणाऱ्या पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यामध्ये, जंगलात न उतरण्याचा सल्ला वनविभागाचे अधिकारी व गिर्यारोहकांनी दिला आहे.

---------------------

त्र्यंबकेश्वर परिसरात धोक्याच्या सूचना

त्र्यंबकेश्वर परिसरातील व तालुक्यातील दुगारवाडी, ब्रह्मगिरी, लेकुरवाळी, नेकलेस धबधबा, अंबोली घाटातील धबधबा, अंजनेरी येथील उलटे धबधबे, हरसुल परिसरात पाच धबधबे असून दोन्हीकडे जास्त पाऊस झाल्यास लहान-मोठे असंख्य धबधबे उद्भवतात. या धबधब्यांवर पावसाळ्यात एन्जाॅय म्हणून जाऊ नये. याबरोबरच गड, किल्ले आदी स्थळांना जाऊ नये. दुगारवाडी धबधब्याने आतापर्यंत १० ते १५ बळी घेतले आहेत. पोलीस व वनविभागाने तर फलक लावून धोक्याची सूचना दिली आहे. या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण मनाई केली आहे. निषिद्ध क्षेत्र म्हणून ही पर्यटनस्थळे घोषित केली आहेत. शनिवार व रविवार संचारबंदी करण्यात आली आहे.